विनोबांची जीवन कथा म्हणजेच प्रेमपंथ अहिंसेचा होय : अनिता जगताप

विनोबांची जीवन कथा म्हणजेच प्रेमपंथ अहिंसेचा होय : अनिता जगताप


उदगीर: आपण सर्वजणच परमेश्वराचे अंश आहोत असे मानणारे विनोबा स्वतः पुण्याचे अभिलाषी नव्हते तरा ते सेवेचे अभिलाषी होते. जगात अहिंसा प्रस्थापित करायची असेल तर अगोदर स्वतःला देहापासुन शक्य तितके अलग राहुन कम करावे लागेलअसे म्हणणारे विनोबा यांची जीवन कथा म्हणजेच प्रेमपंथ अहिंसेचा असे मत अनिता जगताप यांनी व्यक्त यांनी व्यक्त केले.


चला कवितेच्या बनात उपक्रमांतर्गत चालू असलेल्या वाचक संवादाचे 218 वे पुष्प कोरोणाच्या पार्श्वभूमीवर चालू असलेला लाॕक डाऊनमुळे कौटुंबिक स्वरूपात पण फेसबुक लाईव्ह घेण्यात आले. प्रा.राजपाल पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या वाचक संवादात संत ज्ञानेश्वर प्रा.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता जगताप यांनी डाॕ पराग चोळकर लिखित प्रेमपंथ अहिंसेचा या साहित्यकृतीवर संवाद साधताना पुढे म्हणाल्या की, आज जगाला शास्त्राच्या भुकेपेक्षा कळकळीच्या कृतिची गरज आहे असे म्हणणाऱ्या विनोबांच्या जीवनातील अनेक घटना, अनुभव , प्रसंग आणि त्याच्या विचार दर्शनाचे प्रत्येक पैलू सांगितले. शेवटी प्रा.राजपाल पाटील यांनी यथायोग्य अध्यक्षिय समारोप केला.


यानंतर संपन्न झालेल्या चर्चेत फेसबुकवरूनच काही प्रश्न विचारले गेले. यावेळी जन्मदिनाची ग्रंथ भेट देण्यात आली. या वाचक संवादाचे सूत्रसंचालन कु.ऋतुजा पाटील हिने केले. प्रास्ताविक संयोजक अनंत कदम यांनी मांडले तर आभार कु.प्राची अपसंगेकर हिने मानले.


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही