विनोबांची जीवन कथा म्हणजेच प्रेमपंथ अहिंसेचा होय : अनिता जगताप

विनोबांची जीवन कथा म्हणजेच प्रेमपंथ अहिंसेचा होय : अनिता जगताप


उदगीर: आपण सर्वजणच परमेश्वराचे अंश आहोत असे मानणारे विनोबा स्वतः पुण्याचे अभिलाषी नव्हते तरा ते सेवेचे अभिलाषी होते. जगात अहिंसा प्रस्थापित करायची असेल तर अगोदर स्वतःला देहापासुन शक्य तितके अलग राहुन कम करावे लागेलअसे म्हणणारे विनोबा यांची जीवन कथा म्हणजेच प्रेमपंथ अहिंसेचा असे मत अनिता जगताप यांनी व्यक्त यांनी व्यक्त केले.


चला कवितेच्या बनात उपक्रमांतर्गत चालू असलेल्या वाचक संवादाचे 218 वे पुष्प कोरोणाच्या पार्श्वभूमीवर चालू असलेला लाॕक डाऊनमुळे कौटुंबिक स्वरूपात पण फेसबुक लाईव्ह घेण्यात आले. प्रा.राजपाल पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या वाचक संवादात संत ज्ञानेश्वर प्रा.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता जगताप यांनी डाॕ पराग चोळकर लिखित प्रेमपंथ अहिंसेचा या साहित्यकृतीवर संवाद साधताना पुढे म्हणाल्या की, आज जगाला शास्त्राच्या भुकेपेक्षा कळकळीच्या कृतिची गरज आहे असे म्हणणाऱ्या विनोबांच्या जीवनातील अनेक घटना, अनुभव , प्रसंग आणि त्याच्या विचार दर्शनाचे प्रत्येक पैलू सांगितले. शेवटी प्रा.राजपाल पाटील यांनी यथायोग्य अध्यक्षिय समारोप केला.


यानंतर संपन्न झालेल्या चर्चेत फेसबुकवरूनच काही प्रश्न विचारले गेले. यावेळी जन्मदिनाची ग्रंथ भेट देण्यात आली. या वाचक संवादाचे सूत्रसंचालन कु.ऋतुजा पाटील हिने केले. प्रास्ताविक संयोजक अनंत कदम यांनी मांडले तर आभार कु.प्राची अपसंगेकर हिने मानले.


टिप्पण्या
Popular posts
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*