कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९६ टक्के. : एकुर्का रोड : उज्वल यशाची परंपरा कायम. 

 कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९६ टक्के.


एकुर्का रोड : उज्वल यशाची परंपरा कायम. 


 


उदगीर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी , मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९५ : ७४ टक्के लागला असून उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.  


विज्ञान शाखेतील एकूण ४८ विद्यार्थ्यांपैकी ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हर्षदीप पारखे ४९५ गुण घेऊन प्रथम, प्रतिक्षा बिरादार ४८६ गुण घेऊन द्वितीय तर निकीता जाधव ही ४८० गुण घेऊन तृतीय आली आहे. कला शाखेत एकूण ८५ विद्यार्थ्यांपैकी ८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून अंजली केंद्रे ५०० गुण घेऊन प्रथम, ज्योती जाधव ४९९ गुण घेऊन द्वितीय तर किरण पाटील ४९४ गुण घेऊन तृतीय आला आहे. एच.एस.सी.व्होकेशनल कोर्स मध्ये पूजा चिगळे५२२ गुण घेत केंद्रात प्रथम आली आहे. प्रणाली तेलंगे ५२१ गुण घेऊन द्वितीय आली आहे. तर अनिल जाधव हा ५२० गुण घेत तृतीय आला आहे. सर्व गुणवंतांचे संस्था सचिव प्राचार्य प्रमोद चौधरी,पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके, संस्था सदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी, प्रा. बी. एस. बाबळसुरे, प्रा. एन. आर. लांजे, रसूल पठाण, संजय जाधव यांच्या सह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे.


टिप्पण्या
Popular posts
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*