श्री हावगीस्वामीच्यावतीने राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन

श्री हावगीस्वामीच्यावतीने राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन


   श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील मराठी विभागाच्यावतीने राज्यस्तरीय ऑनलाईन काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनामुळे मागच्या तीन महिन्यापासून अधून मधून टाळेबंदी चालू आहे. सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत.विविध माध्यमांच्या माध्यमातून अनेक जण साधक बाधक आपली मते मांडत आहेत.वर्तमान काळातील घडामोडीपासून साहित्याला देखील वेगळे करता येत नाही. साहित्यातील कविता हे अभिव्यक्तीचे एक प्रभावी माध्यम म्हणून ओळखले जाते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कोरोना काळातील घडामोडीवर अभिव्यक्तीसाठी विचारमंच तयार करून द्यावे, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.
     सदरील स्पर्धा राज्यस्तरीय असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आहे.कवितेचा आशय हा कोरोना काळातील विविध घडामोडी संदर्भात अपेक्षित आहे.या काव्यलेखन स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येईल.तरी विद्यार्थ्यांनी आपली कविता 82 75 93 97 35 / 99 22 96 65 26 या व्हाट्सअप क्रमांकावर 25 जुलै 2020 पर्यंत पाठवून द्यावी. कवितेच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण नाव, वर्ग व महाविद्यालयाचे नाव लिहावे. कवितेची भाषा मराठी असावी.
    राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.डी.लोहारे,उपप्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे, मराठी विभागाचे प्रमुख व संयोजक डॉ. एस.वाय. चिमोरे,संयोजक डॉ.म.ई.तंगावार यांनी केले आहे.


टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज