निलंग्यातील पहिल्या महिला गट शिक्षणाधिकारी शत्तारी शफीकाबानू अब्दुल शुकूर सेवानिवृत्त

निलंग्यातील पहिल्या महिला गट शिक्षणाधिकारी शत्तारी शफीकाबानू अब्दुल शुकूर सेवानिवृत्त


निलंगा  : येथील शिक्षण विभागात कार्यरत गेल्या एक वर्षापासून कामर्यरत असलेल्या पहिल्या महिला गट शिक्षणाधिकारी शत्तारी शफीकाबानू अब्दुल शुकूर 30 जून रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्या कार्यकाळात त्यांनी निलंग्यातील शिक्षण क्षेत्रात एक आगळावेगळा ठसा उमटवला होता. या शहरातील शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍या शत्तारी कुटंबीयांच्या स्नुषा आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळाची सुरुवात नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील प्रशाले तून माध्यमिक शिक्षक पदावरुन केली.   


या निमित्त येथील पंचायत समिती सभागृहात गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांच्या हस्ते त्यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला.यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गटविकास अधिकारी अमोल ताकभाते तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय पोषण आहार अधिक्षक सचिन शिंदे व विस्ताराधिकारी संतोष स्वामी हे होते. 


 ताकभाते बोलताना म्हणाले की, शत्तारी यांना शिक्षणाचे अतुट नाते असल्याने त्यांना विद्यार्थ्याना शिकवताना एका वेगळ्या शैलीचा वापर केला. यातून विद्यार्थ्याना आजच्या युगातील शिक्षण घेताना सुलभता मिळाली त्या कायम विद्यार्थ्याच्या शिक्षणावर भर देऊन समाजातील दिन दुबल्या परिवारातील मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. यामुळेच त्यांनी प्रशासनात काम करताना एक आगळावेगळा ठसा उमटवला आहे.


 या कार्यक्रमा वेळी विभागातील सर्व केंद्र प्रमुख, गटसाधन केंद्र कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी पेशंनर असोशियन यांच्या वतिने उपाध्यक्ष तात्याराव धुमाळ, सचिव शत्तारी एस.ए.,कोषाध्यक्ष अनसरवाडकर डी.पी यांनीही सहपत्निक संत्कार केला. यावेळी सेवानिवृत्त झालेले केंद्र प्रमुख गोविंद बिराजदार व मुख्याध्यापक अदिनाथ कुंभार यांचाही सत्कार करण्यात आला. 


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image