सामाजिक समतेचे प्रणेते शाहू महाराज - बसवराज पाटील नागराळकर

सामाजिक समतेचे प्रणेते शाहू महाराज - बसवराज पाटील नागराळकर 
उदगीर : (दिनांक 26 जून)  सामाजिक न्याय, समता, बंधुता यासंबंधी शाहू महाराजांनी केलेले कार्य  भारतीय राज्यघटनेत प्रतिबिंबित होते. प्रतिकूल परिस्थितीत कार्याची प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व म्हणजे राजर्षी शाहू महाराज, असे उद्गार महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी काढले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते. 
               पुढे बोलताना नागराळकर म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी काळाच्या पुढे जाऊन समाजासाठी केलेले कार्य लक्षणीय आहे. सुख संपन्न अवस्थेत जीवन जगत असताना देखील राज्यातील प्रजेच्या दुःखाची असणारी जाणीव व त्या अनुरूप कृती ही शाहू महाराजांच्या कार्याची थोरवी आहे. आपणही शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या आगामी शैक्षणिक वर्षात 'शिक्षक योद्धा' म्हणून कार्य करावे, असे आवाहन उपस्थितांना केले. याप्रसंगी प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांनीही राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. यावेळी व्यासपीठावर सचिव प्रा. मनोहर पटवारी, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. बळीराम भुक्तरे यांनी तर आभार उपप्राचार्य प्रा. डॉ. राजकुमार मस्के यांनी मानले. याप्रसंगी विद्यापीठ व शासकीय नियमाप्रमाणे प्राध्यापकांची उपस्थिती होती.


टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज