निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयात राजभाषा सप्ताह साजरा

निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयात राजभाषा सप्ताह साजरा


 


निलंगा- महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा हिंदी विभागाच्या वतीने दि. १६ सप्टेंबर रोजी अत्यंत उत्साहात हिंदी राजभाषा सप्ताह कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी हिंदी विषयाचे युवा लघु कथाकार व आलोचक डॉ. ऋचा शर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजच्या काळात जागतिक पातळीवर हिंदी भाषेचा विकास व विस्तार अत्यंत गतीने होत आहे परंतू देशातंर्गत शासकीय व राजकीय यंत्रणा मात्र हिंदीच्या विकासाबाबत निष्क्रिय दिसून येत आहेत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना मात्र भाषेचा व राष्ट्रभाषेचा मनी अभिमान बाळगावा व या भाषेमध्येच आपले व्यवहार करावेत जेणे करुन भाषा विकसीत होण्यास मदत होईल असे अवाहन त्यांनी प्रतिपादन केले.


या कार्यक्रमात योगिता शिरुरे, सुमय्या टप्पेवाले, प्रियंका अभंगे या विद्यार्थ्यांनीने राजभाषेसंदर्भात आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके यांनी हिंदी भाषेचे महत्व प्रतिपादीत केले. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. चंद्रकुमार कदम, हिंदी विभागप्रमुख डॉ. बालाजी गायकवाड, डॉ. गोविंद शिवशेट्टे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बालाजी गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आयोजन डॉ. गोविंद शिवशेट्टे यांनी केले तर आभार विद्यार्थीनी मेघा तुळसे यांनी केले. 


टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज