निलंगा येथे रस्त्यावरील खड्यात मनसे ने केले 'बेशरम रोपण'

निलंगा येथे रस्त्यावरील खड्यात मनसे ने केले 'बेशरम रोपण'


::::::::::::::::::::::::::::::::::::::::


गेली अनेक दिवसांपासून निलंगा शहरामध्ये सर्वत्र खड्याचे साम्राज्य पसरले आहे आणि त्यातल्या त्यात शिवाजी चौक ते बँक कॉलॉनी रोड हा फक्त नावालाच डांबरी रस्ता म्हणून राहिला आहे खरे तर पुर्णतः डीवाईडर व मोठ्या खड्ड्यांमुळे रस्ता वाहनचालकासाठी जीवघेणा ठरत आहे. याचा निषेध नोंदवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली खड्यामध्ये बेशरमाचे झाड लावत प्रशासनाचा निषेध केला.


खरे तर पाण्याच्या पाईपलाईन चे काम ज्यावेळेस पासून केले गेले त्यावेळेस पासून शहर अंतर्गत रस्ते हे कमालीचे दुरावस्थापूर्ण झाले आहेत आणि तेव्हापासूनच निलंगा शहरात रस्त्यांवर वाहने चालवणे जिकरी चे झाले आहे. त्यातच आता पावसाळ्यामुळे एकतर मोठाले खड्डे व त्यात साचलेले पाणी या संयोगामुळे सतत अपघात होत आहेत,लोक वाहनाहून पडत आहेत.प्रशासनाने राजा उदार झाला या उक्तीनुसार मुरमाणे खड्डे बुझवणे चालू केले.ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर दगड आणि चिखल झाला आहे त्यामुळे वाहन चालवणे आणखीनच अवघड झाले आहे. तरी लवकरात लवकर रस्ते दुरुस्ती पक्क्या स्वरूपाची करून प्रशासनाने आपण नागरिकांचे पालक आहोत हे दाखवण्याची गरज आहे.अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही कारण जनता खराब रस्त्यांमुळे अतिशय त्रस्त झाली आहे.या वेळी या आंदोलनामध्ये तालुकाध्यक्ष सूरज पटेल,सचिव जाकीर शेख,शहरअध्यक्ष प्रदीप शेळके,जिल्हाप्रसिद्धिप्रमुख यश भिकाणे,उपाध्यक्ष शेख शरीफ,शेख इम्रान,गणेश उसनाळे,खाजा शेख,मुजीब सौदागर,सरदार मुजावर,उमर देशमुख,अंसार शेख आदि उपस्थित होते.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image