शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई द्या केंद्रीय मंत्री दानवेंचे मुख्यमंत्र्याना आव्हान

शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई द्या


केंद्रीय मंत्री दानवेंचे मुख्यमंत्र्याना आव्हान


निलंगा /प्रतिनिधीः- सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी खरीप हंगामात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौर्‍यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नुकसानभरपाई पोटी शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपयेची मदत द्यावी अशी मागणी केली होती. ते आता स्वतः मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांनी मागच्या पंधरा दिवसांत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देवुन हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा शब्द पाळला असे आव्हान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.


           मागच्या पंधरा दिवसापूर्वी निलंगा मतदारसंघात अतिवृष्टी व ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी रावसाहेब दानवे यांनी केली. यावेळी त्यांनी निलंगा येथील किशोर लंगोटे यांच्या शेतात पाहणी करून शेतकर्‍यांशी संवाद साधला. खरीपाच्या सुरुवातीलाच बोगस बियाणांमुळे दुबार पेरणी करावी लागली आणि पीक ऐन काढणीच्या अवस्थेत असताना अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तीळ, तूर, मुग या पीकांचे संपूर्ण नुकसान झाल्याने आम्ही हतबल झालो आहोत अशी व्यथा शेतकर्‍यांनी दानवे यांच्या समोर मांडली. तेव्हा दानवे म्हणाले की एखाद्या भागात एका दिवशी 70 मीमी पेक्षा जास्त पाऊस झाला तर तात्काळ प्रशासनाने अतिवृष्टीचे पंचनामे करून सरकारने तात्काळ शेतकर्‍यांना मदत द्यावी लागते. परंतु हे सरकार शेतकर्‍यांच्या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. नुकसान होऊन पंधरा दिवस उलटले तरी अद्याप पंचनामे झाले नाहीत हि शोकांतिका असुन तोंड पाहून पंचनामे करण्यापेक्षा सरसकट पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यमंत्री संजय बनसोडे नुकसानीच्या पंचनाम्यासाठी विमा कंपनीकडे अर्ज द्या असे सांगत आहेत. या प्रश्नाला उत्तर देताना दानवे म्हणाले राज्यमंत्र्यांनी नुकसानीची माहिती तहसीलदारांकडून घ्यावी अर्ज देण्याची काय गरज आहे असा प्रतिप्रश्न त्यांनी राज्यमंत्र्यांना केला.


       यावेळी माजीमंत्री आ संभाजीराव पाटील निलंगेकर, आ रमेश कराड, प्रदेश सरचिटणीस सुरजितसिंह ठाकूर, युवानेते अरविंद पाटील निलंगेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, जि.प सदस्य बजरंग जाधव, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, बापूराव राठोड , भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष शेषराव ममाळे, तालुकाध्यक्ष शाहुराज थेटे, शेतकरी मधुकर माकणीकर अदी उपस्थित होते.


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही