शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई द्या केंद्रीय मंत्री दानवेंचे मुख्यमंत्र्याना आव्हान

शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई द्या


केंद्रीय मंत्री दानवेंचे मुख्यमंत्र्याना आव्हान


निलंगा /प्रतिनिधीः- सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी खरीप हंगामात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौर्‍यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नुकसानभरपाई पोटी शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपयेची मदत द्यावी अशी मागणी केली होती. ते आता स्वतः मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांनी मागच्या पंधरा दिवसांत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देवुन हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा शब्द पाळला असे आव्हान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.


           मागच्या पंधरा दिवसापूर्वी निलंगा मतदारसंघात अतिवृष्टी व ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी रावसाहेब दानवे यांनी केली. यावेळी त्यांनी निलंगा येथील किशोर लंगोटे यांच्या शेतात पाहणी करून शेतकर्‍यांशी संवाद साधला. खरीपाच्या सुरुवातीलाच बोगस बियाणांमुळे दुबार पेरणी करावी लागली आणि पीक ऐन काढणीच्या अवस्थेत असताना अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तीळ, तूर, मुग या पीकांचे संपूर्ण नुकसान झाल्याने आम्ही हतबल झालो आहोत अशी व्यथा शेतकर्‍यांनी दानवे यांच्या समोर मांडली. तेव्हा दानवे म्हणाले की एखाद्या भागात एका दिवशी 70 मीमी पेक्षा जास्त पाऊस झाला तर तात्काळ प्रशासनाने अतिवृष्टीचे पंचनामे करून सरकारने तात्काळ शेतकर्‍यांना मदत द्यावी लागते. परंतु हे सरकार शेतकर्‍यांच्या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. नुकसान होऊन पंधरा दिवस उलटले तरी अद्याप पंचनामे झाले नाहीत हि शोकांतिका असुन तोंड पाहून पंचनामे करण्यापेक्षा सरसकट पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यमंत्री संजय बनसोडे नुकसानीच्या पंचनाम्यासाठी विमा कंपनीकडे अर्ज द्या असे सांगत आहेत. या प्रश्नाला उत्तर देताना दानवे म्हणाले राज्यमंत्र्यांनी नुकसानीची माहिती तहसीलदारांकडून घ्यावी अर्ज देण्याची काय गरज आहे असा प्रतिप्रश्न त्यांनी राज्यमंत्र्यांना केला.


       यावेळी माजीमंत्री आ संभाजीराव पाटील निलंगेकर, आ रमेश कराड, प्रदेश सरचिटणीस सुरजितसिंह ठाकूर, युवानेते अरविंद पाटील निलंगेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, जि.प सदस्य बजरंग जाधव, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, बापूराव राठोड , भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष शेषराव ममाळे, तालुकाध्यक्ष शाहुराज थेटे, शेतकरी मधुकर माकणीकर अदी उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
*उदगीर नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन* 
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने मोफत मास्क वाटप उदगीर(प्रतिनिधी) वेळोवेळी शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक कार्यातअग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ उदगीर सेट्रलच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून भाजी विक्रेत्यांना व बारा महिने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सुरक्षेसाठी तत्पर असणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोणा आजाराच्या पार्श्वभूमीवर आजाराचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्हा परिषद मैदानावरील भाजीविक्रेते व शहर पोलीस ठाणे येथे कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मोफत मास्क वाटप करण्यात आले.यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे,नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष प्राचार्य डॉ दत्ता पाटील, रो. विशाल जैन, रो. प्राचार्य व्ही.एस कणसे, रो. प्रशांत मांगुळकर, रो. रवी हासरगुंडे, रो. विजयकुमार पारसेवार इ.रोटरीचे पदाधिकारी,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इमेज
दीपावलीचा मुहूर्त साधत नागरिकांच्या गाठीभेटी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारांशी थेट संवाद
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज