• दहा वर्षानंतर गुरुजी झाले *साहेब* पारदर्शकपणे पदोन्नती:जि.प.लातूर   *जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी व मुख्याध्यापक यांचे प्रमोशन*

• दहा वर्षानंतर गुरुजी झाले *साहेब*


पारदर्शकपणे पदोन्नती:जि.प.लातूर


 


*जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी व मुख्याध्यापक यांचे प्रमोशन*


लातूर: शिक्षकांना विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नतीची दहा वर्षापासून रखडलेली प्रक्रिया पूर्ण करीत 12 गुरुजींना शिक्षण विस्तार अधिकारी होण्याची संधी जिल्हा परिषदेने उपलब्ध करून दिली.याचबरोबर 55 शिक्षकांना समुपदेशनाने मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात आल्याने शिक्षक संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे.


लातूर जिल्हा परिषदेच्या नूतन पदाधिका-यांनी मागच्या सहा महिन्यात कोवीड काळ असूनही निर्णयप्रक्रिया गतिमान करीत विविध प्रलंबित प्रश्न सोडविले आहेत.शिक्षकांमधून शिक्षण विस्तार अधिकारी निवडीची प्रक्रिया मागील दहा वर्षापासून प्रलंबित होती.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे ,उपाध्यक्ष व शिक्षण सभापती सौ.भारतबाई साळुंके यांनी यासह मुख्याध्यापक निवडीची प्रक्रिया गतिमान करीत हा विषय मार्गी लावला.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,शिक्षणाधिकारी वैशाली जामदार यांनीही या प्रश्नाला वेग देत समुपदेशनसाठीचे नियोजन केले.त्यानुसार समुपदेशनाने 12 विस्तार अधिकारी व 15 मुख्याध्यापकांना पदोन्नती देण्यात आली. कोणत्याही तक्रारीशिवाय ही पदोन्नती प्रक्रिया पार पाडल्याने शैक्षणिक वर्तुळात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. विविध शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे व उपाध्यक्ष सौ.भारतबाई साळुंके यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.


टिप्पण्या
Popular posts
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*