जनतेच्या आशिर्वादामुळे माझा पुनर्जन्म --माजी आ सुधाकर भालेराव 


उदगीर 


पुणे , मुंबई येथे लाखो रुपये खर्चूनही न मिळणारी आरोग्य सुविधा आता उदगीर मधे मिळत असल्याने मी कोरोना बाधित झाल्या नंतर उपचार लाइफ केअर मधेच घेण्याचे ठरविले आणि हा विश्वास सार्थकी लागला. जनतेच्या आशिर्वाद आणि लाईफ केअर ची टीमने केलेले योग्य उपचार यामुळे माझा पुनर्जन्म झाला असल्याचे माजी आमदार सुधाकर भालेराव यानी सांगितले . 


 श्री भालेराव यांचा उपचारा नंतर लाईफ केअर येथे सत्कार करुन बुलढाणा अर्बन बँकेचे वाघ यांच्या हस्ते कोरोना योद्धा हे सन्मान पत्र


 देण्यात आले . गुरुवार ता.22 रोजी त्याना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना त्यानी नागरीकानी कोरोना झाला तर घाबरुन न जाता लाईफ केअर हॉस्पिटल मधे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि अनुभवी डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाने आजारा पासुन मुक्त व्हावे असे आवाहन केले . 


     ईतर आजार अर्थात कोरोना नसलेल्या नॉन कोविड रुग्नासाठी स्वतंत्र आय सी यू , स्वतंत्र नर्सिंग कर्मचारी , स्वतंत्र वार्ड़ अशी व्यवस्था करण्यात आली आहे . गरजू रुग्नासाठी महात्मा फ़ुले जन आरोग्य योजने आंतर्गत मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे श्री भालेराव यानी सांगितले .


    यावेळी सी एफ ओ अमोल भालेराव , डॉ ज्ञान विकास , डॉ शिवराज सुर्यवंशी , मिलिंद घनपाठी , 


डॉ श्याम हिबाने , राजगोविंद कारभारी , किरण पाटील यांच्यासह हॉस्पिटलचे डॉक्टर, नर्स , आणि कर्मचारी उपस्थीत होते.


टिप्पण्या
Popular posts
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*