शेतकऱ्यांच्या भल्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा - पाशा पटेल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी  

शेतकऱ्यांच्या भल्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा


- पाशा पटेल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी



 लातूर/प्रतिनिधी: केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी नुकतेच घेतलेले निर्णय अतिशय योग्य आहेत. त्यामुळे बाजारात स्पर्धा निर्माण होणार असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी राज्य सरकारनेही यापेक्षा आणखी काही वेगळे करणे शक्य असेल ते करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली.


   केंद्र सरकारने शेती व पणन यासंदर्भात केलेल्या कायद्यांच्या अनुषंगाने विचार-विनिमय करून राज्याचे धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत आयोजित वेबिनारमध्ये पाशा पटेल यांनी ही मागणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही या बैठकीस उपस्थिती होती.


   पाशा पटेल यांनी सांगितले की, बाजारपेठेत स्पर्धा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने हे निर्णय घेतले आहेत.या निर्णयांमुळे बाजार समित्या कायम राहणार असून ज्या ठिकाणी अधिक भाव मिळेल तेथे शेतकरी आपल्या मालाची विक्री करू शकणार आहेत. मनमोहन सिंग यांच्या सरकारने सरकारने खाजगी व्यापाऱ्यांनाही परवाने देण्याचे धोरण स्वीकारले होते. त्याच्यापुढे एक पाऊल मोदी सरकारने टाकले आहे.


   तत्कालीन युती सरकारने ऊसाची झोनबंदी उठवल्यानंतर स्पर्धा वाढली आणि शेतकऱ्यांना भाव मिळाला. मोदी सरकारच्या निर्णयामुळे कोरडवाहू शेती उत्पन्नात स्पर्धा निर्माण होणार आहे. राज्य सरकारने या निर्णयांच्या पाठीशी रहावे, असे आवाहन पाशा पटेल यांनी केले.


   राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या हितासाठी काही बदल करायचे असतील तर त्यांनी आठवडी बाजारावर लक्ष केंद्रित करावे.५० टक्के शेतकरी उत्पादन झाल्यानंतर लगेचच माल विकतो.उर्वरित शेतकरी माल साठवून ठेवतात. शेतकऱ्यांचा हा माल सरकारने खरेदी केला पाहिजे. राज्य शासनाने सोयाबीन खरेदीची तयारी केली आहे परंतु त्यासाठी केवळ ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील सोयाबीन खरेदी करण्यासाठी ३ हजार कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय गाव तिथे वेअर हाउस अशी संकल्पना राबवून शेतकऱ्यांना आपला माल साठवण्याची सोय करून दिली पाहिजे. जो शेतकरी आपला माल वेअर हाऊसमध्ये ठेवेल त्याला ४ टक्के दराने पैसे देण्याचीही व्यवस्था सरकारने करावी. पुढील वर्षी कोणत्या पिकाचे उत्पादन किती होणार आहे? त्याला काय भाव मिळेल ?याचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा उभारावी.पीकपेऱ्याची अचूक माहिती संकलित करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचनाही पाशा पटेल यांनी केल्या.


   राज्यात केवळ ९ टक्के क्षेत्रावर उसाची लागवड केली जाते. त्यासाठी साखर आयुक्त व विविध पदे निर्माण करून यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. परंतु ३० टक्के लागवड होणाऱ्या सोयाबीनसाठी अशी कुठलीही यंत्रणा नसल्याचे पाशा पटेल यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.


 


टिप्पण्या
Popular posts
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज