*उदगीरच्या अर्धवट ट्रामा केअरच्या बांधकामासाठी २.७६ कोटीच्या निधीसाठी प्रशासकीय मान्यता*  - संजय बनसोडे

*उदगीरच्या अर्धवट ट्रामा केअरच्या बांधकामासाठी २.७६ कोटीच्या निधीसाठी प्रशासकीय मान्यता*  - संजय बनसोडे


 मुंबई /उदगीर : उदगीर येथील ट्रामा केअर सेंटर च्या दुसर्‍या टप्प्याच्या बांधकामासाठी महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाने 2.76.60 लक्ष निधी साठीची प्रशासकीय मान्यता दिली आहे. सदर ट्रामा केअर सेंटर चे बांधकाम सन २०१३ मध्ये सुरू करण्यात आले होते. 


परंतु सदर ट्रामा केअर सेंटरचे बांधकाम निधीअभावी अर्धवट स्थितीमध्ये होते त्यामुळे ट्रामा केअर सेंटरची इमारत वापरात नव्हती. अनेक वर्षे धुळखात पडलेल्या ट्रामा केअर सेंटर चालु करण्याबाबत व निधीसाठी ना. संजय बनसोडे यांनी विशेष लक्ष घातले होते व त्यासाठी पालकमंत्री मा. ना. श्री. अमित देशमुख साहेब यांच्या मान्यतेने आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांनी २७६.६० लक्ष इतक्या रकमेचा बांधकामाचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. 


सध्या स्थितीत लातूर जिल्ह्यामध्ये covid-19 रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे त्यासाठी अपूर्ण असलेल्या ट्रामा केअर सेंटरचे काम पूर्ण होणे अत्यंत आवश्यक होते जेणेकरून या इमारतीमध्ये DEDICATED COVID HOSPITAL ( DCH ) सुरू करून रुग्ण सेवा देणे गरजेचे होते. वाढती रुग्ण संख्या पाहता हे काम तात्काळ होणे गरजेचे होते. यासाठी राज्य शासनाने ट्रामा केअर सेंटर च्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामांसाठी २.७६ लाख रू. निधीसाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे.


यासाठी मागील ५ महिन्यापासून मा. ना. श्री. अजितदादा पवार साहेब,वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. अमित विलासराव देशमुख साहेब, मा. ना. श्री. राजेश टोपे साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून सदरील निधी मंजूर करून घेतला आहे,त्यामुळे अनेक वर्षे धूळ खात पडलेला ट्रामा केअर सेंटर चा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे ,त्यामुळे उदगीर व जळकोट तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या आरोग्य सुविधेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ट्रामा केअर सेंटर प्रकल्प पूर्णत्वाला जाऊन सर्व सामान्य नागरिकाच्या आरोग्य सेवेसाठी तयार होणार आहे.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image