प्रा राजपाल पाटील लिखित हिरकणी व यशोदा या* *पुस्तकाचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रकाशन*

प्रा राजपाल पाटील लिखित हिरकणी व यशोदा या* *पुस्तकाचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रकाशन*


 


उदगीर........ प्रा.राजपाल पाटील लिखित हिरकणी (कांदबरी)व यशोदा (कथासंग्रह) या दोन पुस्तकांचे प्रकाशन पाणी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले  


या कार्यक्रमास बस्वराज पाटील नागराळकर (प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ), प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. जयद्रथ जाधव, प्राचार्य शंकरराव राठोड, रमेश अण्णा अंबरखाने, उदगीरपंचायत समितीचे सभापती प्रा.शिवाजी मुळे, कल्याण पाटील (उदगीर काँग्रेस तालूका अध्यक्ष) राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष समीर शेख उपस्थित होते.


यावेळी बोलताना राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, साहित्य हे समाज मनावर परिणाम करत असते. समाजाची सृजनशिल शक्ती साहित्यातून बळकट होण्यास मदत होत असते. दर्जेदार, योग्य साहित्य हे देश व समाज परिवर्तन घडवून असतात. विज्ञान व साहित्य हे समाजाला व देशाला दिशा देण्याचे कार्य करीत असतात, असे त्यांनी म्हंटले.


 प्रा.राजपाल पाटील हे विज्ञानाचे प्राध्यापक असले तरी त्यांना साहित्याची आवड दिसून येते. प्रा. पाटील यांनी मराठी साहित्याचे बरेच लिखाण केले आहे. त्यांच्या साहित्यात सामान्य माणसाचे प्रतिबिंब असते. सामान्य माणसाचे जगणे हे यांच्या साहित्याचा मुख्य गाभा आहे, असे मत राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. तसेच प्रा. पाटील यांच्या हिरकणी याा कादंबरी व यशोदा ह्या कथासंग्रहाच्या माध्यमातून सामाजिक जागृती, सामाजिक प्रबोधन होत आहे. सामान्य व्यक्ती केंद्र बिंदू आहे अशा या कथासंग्रहाचा जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घ्यावा असे अवाहन यावेळी त्यांनी केले.


 


 


टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा