उदगीर अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे २०२० चे वाड:मय पुरस्कार जाहीर

 उदगीर अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे २०२० चे वाड:मय पुरस्कार जाहीर


मुंबई येथील सदानंद पुंडपाळ, पुणे येथील सुनिता राजे पवार, कारंजा येथील प्रदीप देशमुख मानकरी



उदगीर : येथील अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने देण्यात येणारे वाड:मयीन पुरस्कार (सन २०२०) गुरूवारी घोषित करण्यात आले. या पुरस्कारासाठी मुंबई येथील सदानंद पुंडपाळ, पुणे सुनिताराजे पवार तर कारंजा येथील प्रदीप देशमुख यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
कै. राजकुमार दत्तात्रय बेंबडे स्मृती पुरस्कार मुंबई येथील शिवाजी पुंडपाळ यांच्या नाचू वाचू आनंदाने या बालकथा संग्रहास, कै. लक्ष्मीबाई विठोबा केदार स्मृती पुरस्कार कारंजा येथील प्रदीप देशमुख यांच्या गर गर भोवरा या बालकविता संग्रहाला तर कै. विजयकुमार दत्तात्रय बेंबडे स्मृती पुरस्कार पुणे येथील सुनिताराजे पवार यांच्या कांडा या बालकादंबरी संग्रहाला जाहीर झाला आहे. प्रत्येकी ५०५१ / - रू. रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रतिनिधी संजय ऐलवाड, अध्यक्ष प्रा. रामदास केदार, कार्यवाह रसूल दा. पठाण यांनी दिली. यावेळी समन्वयक प्रशांत शेटे, उपाध्यक्ष दयानंद बिरादार, कोषाध्यक्ष लक्ष्मण बेंबडे, सदस्य शिवकुमार डोईजोडे, विक्रम हलकीकर, सिद्धार्थ सुर्यवंशी, ज्योती डोळे, चंद्रदीप नादरगे, चंद्रशेखर कळसे यांच्यासह संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. उदगीर येथील अ. भा. बालकुमार साहित्य संस्था स्थापनेला ३ वर्षे पूर्ण झाली असून यापूर्वी मुंबईचे एकनाथ आव्हाड, नाशिक येथील संजय वाघ सोलापूर च्या आशा पाटील व पुणे येथील संंजय ऐलवाड यांना गौरविण्यात आले आहे. तर सन २०१९ चे शिवाजी चाळक पुणे, सुनंदा गोरे औरंगाबाद व वर्षा चौगुले, सांगली यांना जाहीर झाला आहे.

टिप्पण्या
Popular posts
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*