मुंबई व तिरुपती नियमित रेल्वेसाठी पाठपुरावा करू : विभागीय व्यवस्थापक अभय गुप्ता


मुंबई व तिरुपती नियमित रेल्वेसाठी पाठपुरावा करू : विभागीय व्यवस्थापक अभय गुप्ता

उदगीर : लातूर ते तिरुपती व बिदर ते मुंबई व्हाया उदगीर ही रेल्वे नियमित चालू करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करू अशी ग्वाही रेल्वेचे सिंकदराबाद येथील दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक अभयकुमार गुप्ता यांनी उदगीर येथील शिष्टमंडळास दिली.

    मंगळवारी (दि. 22 रोजी) उदगीर रेल्वे स्थानकात विभागीय व्यवस्थापक सिकंदराबाद विभाग दक्षिण मध्य रेल्वे (DRM)हे परीक्षण दौऱ्यावर आले होते. यावेळी उदगीर येथील रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने विभागीय व्यवस्थापक गुप्ता यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी यावेळी स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत रेल्वे स्थानक परिसरात पालिकेच्या वतीने सुलभ शॉचालय उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने परवानगी द्यावी अशी मागणी विभागीय व्यवस्थापकांना पत्र देऊन केली आहे.

      विलास साखर कारखाना युनिट 2 च्या वतीने माल वाहतुक सुलभ होण्याच्या दृष्टीने योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी उदगीरकरांनी केलेल्या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत विभागीय व्यवस्थापक अभयकुमार गुप्ता यांनी दुसरा प्लॅटफॉर्म शेड 48 मीटर, सी. सी. टी. व्ही, कोच डिस्प्ले बोर्ड मंजूर केल्याची घोषणा केली व मार्च 2022 अगोदर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्याना दिल्या. उदगीर स्थानकातून होणाऱ्या मालवाहतुकीतीस प्राधान्य देण्यास प्रशासन प्राथमिकता देत असून लहान शेतकऱ्याच्या उत्पादनासही सुविधा देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

       यावेळी रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे, उमाकांत वडजे, साईनाथ चिमेगावे, अहमद सरवर, विजय पारसेवार, अजीम दायमी, शंकर मुक्कावार, रवींद्र हसरगुंडे, अश्फाक शेख, शैलेश कस्तुरे, रामभाऊ मोतीपवळे, विक्रम हलकीकर, इरफान शेख, बसवराज डावळे, अशोक तोंडारे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज