निलंगा ऊस उत्पादक चिंतेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना साकडे

 निलंगा ऊस उत्पादक चिंतेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना साकडे


 निलंगा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे विधानसभा कार्याध्यक्ष संदिप मोरे यांच्या नेतृत्वात विधानसभा अध्यक्ष सुधीरदादा मसलगे यांच्या सुचनेनुसार मा. ना. अजितदादा पवार यांची काल मंत्रालय मुंबई येथे भेट घेतली .

 यावेळी निलंगा तालुक्यातील अंबुलगा व किल्लारी साखर कारखाने बंद असल्याने निलंगा तालुक्यातील शेतकरी 12-14 महिने होऊन सुध्दा कुठे ऊस कुठे घालायचा यासंदर्भात चिंतेत आहे. 

जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटिल यांच्याही हि बाब निदर्शनास आणुन दिली होती व तसेच जिल्हाध्यक्ष यांनी भाऊसाहेब बिरादार साखर कारखान्यावरिल अधिकारी गुरव  यांनाही निलंगा तालुक्यातील ऊसासंदर्भात सुचना दिल्या होत्या तरीपण गाड्यांचा तुटवडा असल्याने शेतकरी चिंतेत आहेत ही बाब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कानावर घालण्यात आली व त्यांनी साखर आयुक्ताना सुचना देवुन वेगवेगळ्या कारखान्याना सुचना देवुन निलंगा तालुक्यातील शेतकरी यांचे ऊसाचे एक टिपरुही ठेवणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिष्टमंडळाला दिली. 

यावेळी जिल्हाउपाध्यक्ष अंगद जाधव, विधानसभा कार्याध्यक्ष संदिप मोरे, प्रदेश सरचिटणीस सोशल मिडिया किरण सोळुंके आदि पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या
Popular posts
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा