*विद्रोही मराठी साहित्य संमेलन उदगिरच्या कार्यालय चे उद्घाटन* विविध समित्या निवडीबद्दल चर्चा

 *विद्रोही मराठी साहित्य संमेलन उदगिरच्या कार्यालय चे उद्घाटन* 

विविध समित्या निवडीबद्दल चर्चा


उदगीर : १६वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन उदगीर च्या कार्यालयाचे उद्घाटन प्राचार्य विरभद्र घाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्रोही सांस्कृतिक चळवळ राज्य अध्यक्ष प्रा.प्रतिमा परदेशी होत्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्रोही सांस्कृतिक चळवळ चे कार्यकारी सचिव यशवंत मकरंद, राज्य उपाध्यक्ष प्राचार्य विठ्ठल घुले, स्वागताध्यक्ष डॉ.अंजूम कादरी, उपाध्यक्ष डॉ ‌सुरेश शेळके, सरफराज अहमद, अर्जुन बागुल,अमिन शेख उपस्थित होते.
यावेळी १६वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीची व विद्रोही सांस्कृतिक चळवळ राज्य कार्यकारिणी ची संयुक्त बैठक आज दि .२७/२/३२ रोजी संस्था च्या जमहुर हायस्कूल उदगिर येथे संपन्न झाली.
या बैठकीत १६ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन उदगीर शहराच्या मध्यवर्ती ठिकाण जिल्हा परिषद शाळा
च्या मैदानावर २३एप्रिल व २४एप्रिल २०२२ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा स्वागताध्यक्ष डॉ.अंजुम कादरी यांनी केली.
सदर मैदानाच्या संदर्भात
मान्यतेची प्रक्रिया पुर्ण झाली.असे आयोजकांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी संमेलनाच्या स्मरणिका समिती,ग्रंथदिंडी समिती,युवा समिती, बालमंच समिती,मूठभर धान्य व एक रुपया विद्रोही साठीसमिती,कवी संमेलन नियोजन समिती,कविता निवड समिती, अशा विविध समितीचे प्राथमिक गठण करण्याविषयी चर्चा झाली.
प्रा.मारोती कसाब, बाबुराव मशाळकर,कॉ.राजीव पाटील, प्राचार्य विरभद्र घाळे, अहमद सरवर ,संदिप पाटील,जुनेद भाई, श्रीनिवास एकुर्केकर, सिध्देश्वर लांडगे,शेख अयाज,हाश्मी मॅडम, एकनाथ कांबळे, गोलंदाज वाजीदखान, गायकवाड, संजय काळे, एकनाथ कांबळे, व्यंकट सुर्यवंशी,सतिश नायकवाडे, प्रफुल्ल धामनगावकर अंकुश सिंदगिकर, दृपदा गवळी, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम पार पडला.
टिप्पण्या
Popular posts
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*