*विद्रोही मराठी साहित्य संमेलन उदगिरच्या कार्यालय चे उद्घाटन* विविध समित्या निवडीबद्दल चर्चा

 *विद्रोही मराठी साहित्य संमेलन उदगिरच्या कार्यालय चे उद्घाटन* 

विविध समित्या निवडीबद्दल चर्चा


उदगीर : १६वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन उदगीर च्या कार्यालयाचे उद्घाटन प्राचार्य विरभद्र घाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्रोही सांस्कृतिक चळवळ राज्य अध्यक्ष प्रा.प्रतिमा परदेशी होत्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्रोही सांस्कृतिक चळवळ चे कार्यकारी सचिव यशवंत मकरंद, राज्य उपाध्यक्ष प्राचार्य विठ्ठल घुले, स्वागताध्यक्ष डॉ.अंजूम कादरी, उपाध्यक्ष डॉ ‌सुरेश शेळके, सरफराज अहमद, अर्जुन बागुल,अमिन शेख उपस्थित होते.
यावेळी १६वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीची व विद्रोही सांस्कृतिक चळवळ राज्य कार्यकारिणी ची संयुक्त बैठक आज दि .२७/२/३२ रोजी संस्था च्या जमहुर हायस्कूल उदगिर येथे संपन्न झाली.
या बैठकीत १६ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन उदगीर शहराच्या मध्यवर्ती ठिकाण जिल्हा परिषद शाळा
च्या मैदानावर २३एप्रिल व २४एप्रिल २०२२ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा स्वागताध्यक्ष डॉ.अंजुम कादरी यांनी केली.
सदर मैदानाच्या संदर्भात
मान्यतेची प्रक्रिया पुर्ण झाली.असे आयोजकांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी संमेलनाच्या स्मरणिका समिती,ग्रंथदिंडी समिती,युवा समिती, बालमंच समिती,मूठभर धान्य व एक रुपया विद्रोही साठीसमिती,कवी संमेलन नियोजन समिती,कविता निवड समिती, अशा विविध समितीचे प्राथमिक गठण करण्याविषयी चर्चा झाली.
प्रा.मारोती कसाब, बाबुराव मशाळकर,कॉ.राजीव पाटील, प्राचार्य विरभद्र घाळे, अहमद सरवर ,संदिप पाटील,जुनेद भाई, श्रीनिवास एकुर्केकर, सिध्देश्वर लांडगे,शेख अयाज,हाश्मी मॅडम, एकनाथ कांबळे, गोलंदाज वाजीदखान, गायकवाड, संजय काळे, एकनाथ कांबळे, व्यंकट सुर्यवंशी,सतिश नायकवाडे, प्रफुल्ल धामनगावकर अंकुश सिंदगिकर, दृपदा गवळी, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम पार पडला.
Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image