महाराष्ट्रातील चारित्र्यसंपन्न, नितीवान आणि निष्ठावंत व्यक्तीमत्व स्व.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर -प्राचार्य डॉ. संजय वाघमारे

 *महाराष्ट्रातील चारित्र्यसंपन्न, नितीवान आणि निष्ठावंत व्यक्तीमत्व स्व.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर*

-*प्राचार्य डॉ. संजय वाघमारे*


निलंगा- महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या चारित्र्याचा आणि नितीमत्तेचा आगळावेगळा ठसा उमटवणारे, पक्षाशी एकनिष्ठ राहणारे नेतृत्व म्हणून महाराष्ट्र स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकरांना कधीही विसरणार नाही. सर्वांना सोबत घेऊन राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणा-या आपल्या ५६ वर्षाच्या कारकीर्दीत महाराष्ट्रात विविध खात्यांच्या माध्यमातून विकासाची काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. याशिवाय शिक्षणाच्या क्षेत्रात निलंगा आणि परिसरात शाळा, महाविद्यालयांची स्थापना करुन ग्रामीण भागापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहंचवण्याचे महत्वाचे काम स्व. डॉ. निलंगेकर साहेबांनी केले असे मत नळेगाव येथील शिवजागृती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय वाघमारे यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र महाविद्यालयात आयोजित स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानमालेत बोलत होते. त्यांनी आपल्या व्याख्यानातून स्व.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या जीवनातील अनेक घटना आणि प्रसंगांच्या आधारे जीवनमुल्ये व आदर्श उपस्थितांसमोर उभे केले. 

याप्रसंगी विचारमंचावर अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत पौळ, महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, उपप्राचार्य डॉ. चंद्रकुमार कदम, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, डॉ. एस.एस.पाटील आदी उपस्थित होते. 

अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. भागवत पौळ यांनी स्व. डॉ. निलंगेकर साहेबांच्या कार्य आणि कर्तृत्वाची माहिती देऊन प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन यश प्राप्ती करण्यासाठी स्व. डॉ. निलंगेकर साहेबांचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवावा असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या आयोजनापाठीमागची भुमिका उपप्राचार्य डॉ. चंद्रकुमार कदम यांनी प्रास्ताविकातून मांडली. 

स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांनीही प्रातिनिधीक स्वरुपात स्व. डॉ. निलंगेकर साहेबांना आपल्या वक्तृत्व कलेतून अभिवादन केले. कार्यक्रमासाठी महाराष्ट्र महाविद्यालय, महाराष्ट्र औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, महाराष्ट्र प्राथमिक विद्यामंदीर व महाराष्ट्र विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठी विभागप्रमुख डॉ. भास्कर गायकवाड व प्रा. श्रीकृष्ण दिवे यांनी केले तर आभार प्रा. सुरेश कुलकर्णी यांनी मानले.

Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image