काँग्रेसने जिल्ह्यात स्वबळावर निवडणूकलढवून दाखवावी : आ. निलंगेकर

काँग्रेसने जिल्ह्यात स्वबळावर निवडणूकलढवून दाखवावी : आ. निलंगेकर


निलंगा - स्वबळावर निवडणूक लढविण्याची, लातूर जिल्ह्यासह मराठवाडा भाजमुक्त करण्याचा
वल्गना करणाऱ्या काँग्रेस पक्षाने राज्यातील निवडणूक लढविण्याचा निर्णय काय होईल ते होईल किमान लातूर जिल्ह्यात तरी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवून दाखवावी. असे अवाहन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व पालकमंत्री अमित देशमुख यांना माजीमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिले आहे.
निलंगा तालुक्यातील काही भाजपा कार्यकर्त्यांचा मुंबई येथे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला.
त्याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लातूरसह मराठवाडा भाजपा मुक्त करण्याचा पटर्न निर्माण करण्याचे सुतोवाच करून आगामी स्थानिक
स्वराज्य संस्थेच्या निवडणुका
स्वबळावर लढवणार असल्याचे
जाहीर केले होते. गेली अनेक
वर्षे राजकारणात सोबत काम
करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पक्ष
सोडून गेल्यानंतर वेदना तर होत
असतातच. मात्र राजकारणात
राजकारणात जास्त महत्त्वकांक्षा निर्माण झाली की, कांही कार्यकर्ते पक्षांतर करत
असतात त्याबद्दल मी कांही बोलणार नाही असे म्हणत त्यानी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई येथे कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळेस केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत संभाजीपाटील निलंगेकर यांनी काँग्रेसने
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका राज्याचे सोडा किमान लातूर जिल्ह्यात तरी स्वतंत्र लढवून दाखवावी
असे खुले आव्हान दिले. पक्षांतर केलेल्या कार्यकर्त्यांनी नव्या घरी सुखाने नांदावे अशा शुभेच्छा दिल्या. अनेक वर्षापासून असलेले ओबीसी समाजाचे आरक्षणाचा हक्क महाविकास आघाडी सरकारने हिरावून घेतले आहे. महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील ओबीसी समाज आरक्षणापासून वंचित राहीला. यास सर्वस्वी ठाकरे सरकार जबाबदार आहे. मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी एक चकार शब्दही बोलले नाहीत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारची ओबीसी, मराठा समाजाला आरक्षण द्यायची नियत नसल्याची टिका त्यांनी यावेळी केली.
यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, किशोर जाधव उपस्थित होते.
टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज