साहित्य संमेलनाची उंची वाढवण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढे यावे -राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे आवाहन






साहित्य संमेलनाची उंची वाढवण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढे यावे

-राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे आवाहन



उदगीर : अखिल भारतीय साहित्य संमेलनाची संधी उदगीरच्या रूपाने लातूर जिल्ह्याला मिळाली आहे. जिल्हाभरातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी या संमेलनात आपले योगदान देऊन संमेलनाची उंची वाढवण्यासाठी पुढे यावे. या साहित्य संमेलनाचे नाव जगभरात जाण्यासाठी प्रशासनाने तत्पर राहण्याचे आवाहन संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.
उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील साहित्य संमेलनाच्या सभागृहात साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रशासकीय अधिकार्‍यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी लातूरचे जिल्हाधिकारी बी पी पृथ्वीराज, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर पाटील, पंचायत समितीचे सभापती शिवाजी मुळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, तहसीलदार रामेश्वर गोरे, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता एम.एम.पाटील, उपविभागीय अधिकारी दत्तात्रय देवकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता दराडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी नेरपगार ,उपविभागीय पोलिस अधिकारी डेनीयल बेन, शहर पोलीस निरीक्षक गोरख दिवे, महादेव नौबद्दे, डॉ श्रीकांत मध्वरे, डॉ आर. एन लखोटिया, प्राचार्य आर आर तांबोळी उपप्राचार्य डॉ राजकुमार मस्के, मादलापूरचे सरपंच उदयसिंह मुंडकर, ताहेर हुसेन, श्याम डावळे, जितेंद्र शिंदे, गजानन साताळकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुखाची उपस्थिती होती.
यावेळी राज्यमंत्री बनसोडे म्हणाले
उदगीर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळत आहे. लातूर जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख यांनी संमेलनासाठी जे जे आवश्यक आहेत त्या त्या सुविधा निर्माण करून द्याव्यात. या साहित्य संमेलनाचे नाव जगभरात जाणार असून संबंध लातूर जिल्ह्याचे नाव होणार आहे. या संमेलनासाठी समाजातील सर्व घटक संस्था सर्व पक्ष साहित्यिक सर्वांचे योगदान मिळत असून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्वांच्या सोबत संमेलनासाठी योगदान द्यावे.
यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज म्हणाले सर्व विभाग प्रमुखांनी साहित्य संमेलनाची निगडित असलेली सर्व कामे अवघ्या दहा दिवसात सुरू करावीत. संमेलन परिसरात व संमेलन स्थळी जोडणारे सर्व रस्त्यांची कामे सुरू करण्याचे निर्देश देत सर्व प्रशासकीय अधिकारी साहित्य संमेलनासाठी योगदान देण्यासाठी सर्वांसोबत असल्याचे यावेळी सांगितले.
प्रास्ताविक नियोजन विभाग प्रमुख दिनेश सास्तुरकर यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी संमेलनासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींचे विवेचन केले. संमेलन स्थळी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी कामाला लागण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव जेवळीकर यांनी तर उपस्थितांचे आभार संस्थाध्यक्ष श्री नागराळकर यांनी मानले.
------------------------------------------
एक लाखांचा धनादेश....
------------------------------------------

हे साहित्य संमेलन दर्जेदार व जगामध्ये नावलौकिक होण्यासाठी अनेक संस्था व व्यक्ती आर्थिक निधी देण्यासाठी पुढे येत आहेत.या कार्यक्रमात मलकापूर ग्राम पंचायतीचे उपसरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील यांनी मलकापूर ग्राम पंचायतीच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश संयोजन समितीकडे सुपूर्त केला.
टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज