*मजविपच्या निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न*

*मजविपच्या निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न*



उदगीर : येथील मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित शालेय व महाविद्यालयीन गटातील निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयात उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या हस्ते झाले.  अध्यक्षस्थानी डॉ. रामप्रसाद लखोटिया होते. मंचावर सहसचिव प्राचार्य डॉ.दत्ता पाटील यांची उपस्थिती होती. शालेय गटात प्रथम लालबहादूर शास्त्री विद्यालयाचा कुणाल विष्णू पाटील रोख तीन हजार रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र ,द्वितीय छत्रपती शाहू सैनिकी विद्यालयाचा बोधवापोड कार्तिक राजीव रोख दोन हजार रुपये स्मर्तिचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय शामर्या कन्या विद्यालयाची समीक्षा श्रीकृष्ण परगे, रोखएक हजार रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ छत्रपती राजर्षी शाहू सैनिक विद्यालयाचा अभिषेक साईनाथ झीलकरवार रोख पाचशे रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास केंद्र प्रणिता बुद्धिवंत रोख पाचशे रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, महाविद्यालयीन गटात संत तुकाराम विधी महाविद्यालयाची अर्गीता नंद प्रकाश विश्वनाथे रोख तीन हजार रुपये स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र ,द्वितीय रेणुका राजकुमार जाधव श्री हावगि स्वामी महाविद्यालय रोख दोन हजार रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय श्री हावगी स्वामी महाविद्यालयाची प्रांजल संतोष स्वामी रोख एक हजार रुपये स्मर्तिचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय उदगीर पोगा ऋषिकेश बालू पाचशे रुपये रोख व स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, संत तुकाराम विधी महाविद्यालयाची बिरादार श्रद्धा सुनील हीस रोखपाचशे रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. मराठवाडा मुक्ती संग्रामात लातूर जिल्ह्याचे योगदान आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या पार्श्वभूमीवर युवकांची विकासात्मक भूमिका या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या स्पर्धेचे परीक्षण प्रा. अर्जुन सोमवंशी, बाबुराव माशाळकर, प्रा. डॉ.नरसि गकदम ,प्रा. विलास गाजरे यांनी केले. शहरातील विविध अडोतीस शाळा महाविद्यालयातील चाळीस हजार विद्यार्थ्यांमध्ये  गाथा मुक्ती लढ्याची व्याख्यान देणाऱ्या वक्ते विशाल तोंडचिरकर, प्रा. डॉ.गौरव जेवळीकर ,बालाजी मूस्कावाड ,प्रा.डॉ. दत्ता हरी होनराव, प्रा. धनराज बंडे, मुरलीधर जाधव, राजेंद्र चव्हाण आणि विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच स्पर्धेचे प्रायोजक अनिल पत्तेवार ,विशाल तोंडचिरकर ,प्रा. डॉ. एस .एन .शिंदे यांचाही प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शाळा महाविद्यालयामध्ये व्याख्यानमाला आयोजित केल्याबद्दल उपप्राचार्य डॉ. आप्पाराव काळगापुरे, मुख्याध्यापक ए. बी. हक्के, बाबुराव पाटील, प्रतीक्षा मुंडकर ,शंकर हम्पले यांना प्रतिनिधीक स्वरूपात सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. 

यावेळी सुशांत शिंदे म्हणाले मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास विद्यार्थ्यापर्यंत नेऊन जनजागृती केल्याबद्दल मराठवाडा जनता विकास परिषदेचे कौतुक केले, परिस्थितीचा बाऊ न करता विद्यार्थ्यांनी पुढे जाण्याचे आवाहन केले, स्तुत्य उपक्रमाबद्दल तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी विद्यार्थी व संस्थाचालक, शिक्षकांचे अभिनंदन केले. 

समारोपात डॉ. लखोटिया यांनी स्वराज्याचे सूराज्यात रूपांतर होण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कटिबद्ध होण्याचे आवाहन केले . 

स्वागत गीत रेखा माने यांनी गायले.प्रास्ताविक प्रा. एस .एस. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रवीण जाहूरे यांनी केले. आभार राम मोतीपवळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधव कल्याणकर, दीपक बलसुरकर ,गणेश मुंडे यांच्यासह मराठवाडा जनता विकास परिषदेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले

टिप्पण्या
Popular posts
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज
लातूर लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान ; 19 लाखापेक्षा अधिक मतदार संख्या • जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू • मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविणार : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे
इमेज
आंध्र प्रदेशातील विद्यार्थांना उदगीरच्या निवारा केंद्राचा आधार नगराध्यक्ष बागबंदे यांची तत्परता : घरी पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू उदगीर: उदगीरच्या रेल्वे पटरीवरुन काही विध्यार्थ्यांचा ग्रुप हैदराबादकडे पायी जात असल्याची माहिती मिळताच तत्परता दाखवीत उदगीरचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी या विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात असल्याचे नगराध्यक्ष बागबंदे यांनी सांगितले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम व शेजारच्या जिल्ह्यातील 16 विद्यार्थी उदगीर येथील ऍग्रीकल्चर ट्रेनिंग सेंटर येथे ट्रेनिंग घेत असत. शहरातील एस. टी. कॉलनी भागात एकत्र होस्टेलवर रहायला होते. सध्या देशभरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढला असून तो प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय झाली. देशात कोरोना विषाणूंमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चिंतेपोटी विद्यार्थ्यांना गावाकडे परत येण्याचा आग्रह धरला होता. एकीकडे पालकांचा आग्रह तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे परत जाण्यासाठी कसलीच सोय नसल्याने विद्यार्थी चिंतेत सापडले होते. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित विचार करून पायी गावाकडे जाण्याची तयारी केली. आपले सामान खांद्यावर घेऊन रेल्वे पटरी मार्गाने हे सर्व विद्यार्थी गावाकडे जायला निघाले. भाजपाच्या कार्यकर्त्यास हे लक्षात आल्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे रयांच्याशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनंती केली. नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी तात्काळ माणुसकीच्या भावनेतून तत्परता दाखवित रोटी कपडा बँकेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची उदगीर नगर परिषदेने बांधलेल्या निवारा केंद्रात राहण्याची व जेवणाची सोय केली. शिवाय या विद्यार्थ्यांची त्यांच्या गावी परत जाण्यासाठी सर्व ती मदत करणार असल्याचे सांगत त्यांच्या जाण्याची सोय होइपर्यंत या सर्व विद्यार्थ्यांची या निवारा केंद्रात सर्व सोय करण्याच्या सूचना संबंधितांना देऊन नगराध्यक्षांनी वैयक्तिक पाच हजार रुपये या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी दिले. यावेळी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना हात मास्क व सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सुधीर भोसले, नगरसेवक मनोज पुदाले, रामचंद्र मुक्कावार, अॅड. दत्ताजी पाटील, अॅड. सावन पस्तापुरे, रामेश्वर पवार, रोटी कपडा बँकेचे खुर्शीद आलम व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान नगरसेवक अॅड. दत्ताजी पाटील यांनी श्रीकोलमच्या प्रशासनासोबत या विद्यार्थ्यांचा संवाद साधून दिला.
इमेज
*राष्ट्रपतीच्या दौऱ्यासाठी उदगीर नगरी सज्ज*
इमेज
उदगीरच्या दूध डेअरीसंदर्भात लवकरच एन डी डी बी च्या अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक
इमेज