*मजविपच्या निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न*

*मजविपच्या निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न*



उदगीर : येथील मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित शालेय व महाविद्यालयीन गटातील निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयात उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या हस्ते झाले.  अध्यक्षस्थानी डॉ. रामप्रसाद लखोटिया होते. मंचावर सहसचिव प्राचार्य डॉ.दत्ता पाटील यांची उपस्थिती होती. शालेय गटात प्रथम लालबहादूर शास्त्री विद्यालयाचा कुणाल विष्णू पाटील रोख तीन हजार रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र ,द्वितीय छत्रपती शाहू सैनिकी विद्यालयाचा बोधवापोड कार्तिक राजीव रोख दोन हजार रुपये स्मर्तिचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय शामर्या कन्या विद्यालयाची समीक्षा श्रीकृष्ण परगे, रोखएक हजार रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ छत्रपती राजर्षी शाहू सैनिक विद्यालयाचा अभिषेक साईनाथ झीलकरवार रोख पाचशे रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास केंद्र प्रणिता बुद्धिवंत रोख पाचशे रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, महाविद्यालयीन गटात संत तुकाराम विधी महाविद्यालयाची अर्गीता नंद प्रकाश विश्वनाथे रोख तीन हजार रुपये स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र ,द्वितीय रेणुका राजकुमार जाधव श्री हावगि स्वामी महाविद्यालय रोख दोन हजार रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय श्री हावगी स्वामी महाविद्यालयाची प्रांजल संतोष स्वामी रोख एक हजार रुपये स्मर्तिचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय उदगीर पोगा ऋषिकेश बालू पाचशे रुपये रोख व स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, संत तुकाराम विधी महाविद्यालयाची बिरादार श्रद्धा सुनील हीस रोखपाचशे रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. मराठवाडा मुक्ती संग्रामात लातूर जिल्ह्याचे योगदान आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या पार्श्वभूमीवर युवकांची विकासात्मक भूमिका या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या स्पर्धेचे परीक्षण प्रा. अर्जुन सोमवंशी, बाबुराव माशाळकर, प्रा. डॉ.नरसि गकदम ,प्रा. विलास गाजरे यांनी केले. शहरातील विविध अडोतीस शाळा महाविद्यालयातील चाळीस हजार विद्यार्थ्यांमध्ये  गाथा मुक्ती लढ्याची व्याख्यान देणाऱ्या वक्ते विशाल तोंडचिरकर, प्रा. डॉ.गौरव जेवळीकर ,बालाजी मूस्कावाड ,प्रा.डॉ. दत्ता हरी होनराव, प्रा. धनराज बंडे, मुरलीधर जाधव, राजेंद्र चव्हाण आणि विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच स्पर्धेचे प्रायोजक अनिल पत्तेवार ,विशाल तोंडचिरकर ,प्रा. डॉ. एस .एन .शिंदे यांचाही प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शाळा महाविद्यालयामध्ये व्याख्यानमाला आयोजित केल्याबद्दल उपप्राचार्य डॉ. आप्पाराव काळगापुरे, मुख्याध्यापक ए. बी. हक्के, बाबुराव पाटील, प्रतीक्षा मुंडकर ,शंकर हम्पले यांना प्रतिनिधीक स्वरूपात सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. 

यावेळी सुशांत शिंदे म्हणाले मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास विद्यार्थ्यापर्यंत नेऊन जनजागृती केल्याबद्दल मराठवाडा जनता विकास परिषदेचे कौतुक केले, परिस्थितीचा बाऊ न करता विद्यार्थ्यांनी पुढे जाण्याचे आवाहन केले, स्तुत्य उपक्रमाबद्दल तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी विद्यार्थी व संस्थाचालक, शिक्षकांचे अभिनंदन केले. 

समारोपात डॉ. लखोटिया यांनी स्वराज्याचे सूराज्यात रूपांतर होण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कटिबद्ध होण्याचे आवाहन केले . 

स्वागत गीत रेखा माने यांनी गायले.प्रास्ताविक प्रा. एस .एस. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रवीण जाहूरे यांनी केले. आभार राम मोतीपवळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधव कल्याणकर, दीपक बलसुरकर ,गणेश मुंडे यांच्यासह मराठवाडा जनता विकास परिषदेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले

टिप्पण्या
Popular posts
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*