विविध सामाजिक उपक्रमांनी मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस निलंगा शहरात साजरा...

विविध सामाजिक उपक्रमांनी मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस निलंगा शहरात साजरा...




निलंगा : मराठा आरक्षण चळवळीतील प्रमुख नेते मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस सकल मराठा समाजाच्या वतीने विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

वाढदिवसाच्या निमित्ताने निलंगा तालुक्यात व निलंगा शहरात विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.सर्वप्रथम ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिरात सकाळी अभिषेक करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, बसस्थानक,कोर्ट, तहसील, पंचायत समिती, नगर पालिका, दादापीर दर्गा येथे वृक्षारोपण करण्यात आले व छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक हजार एक (१००१) वृक्ष वाटप करण्यात आले त्यात चिकू, केशर आंबा, डाळिंब, लिंबू या झाडांचा समावेश होता,त्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने उपस्थितांना अल्पोपहार म्हणून खिचडी वाटप करण्यात आली.


यावेळी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सकल मराठा समाजाच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक गावात वाढदिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले.

टिप्पण्या
Popular posts
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*