बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम

बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न

संस्कार भारतीचा उपक्रम



उदगीर :  येथील संस्कार भारती समिती, उदगीर व मातृभूमी महाविद्यालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने  'दिपसंध्या' हा नाट्य संगीतावर आधारलेला सांगितिक कार्यक्रम बहारदार नाट्यगीतांनी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी जयेंद्र कुलकर्णी, अंबाजोगाई, गोपाळ जोशी, उदगीर, केदार जोशी, उदगीर या गायकांनी रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी नाट्यगीते सादर केली. यामध्ये नमन नटवरा विस्मयकारा, मर्मबंधातली ठेव ही, सोहम हर डमरू बाजे, दिन गेले भजनाविन सारे, देवाघरचे ज्ञात कुणाला, कधी भेटेल वनवासी नियोगी रामचंद्राला, घेई छंद मकरंद, दिव्य स्वातंत्र्य रवी, नारायणा रमारमणा, कर हा करी धरीला शुभांगी, काटा रुते कुणाला, छेडून गेले मधुर स्वरविमल, हे सुरांनो चंद्र व्हा, प्रिये पहा रात्रीचा समय सरून, वैकुंठीचा राया या नाट्यगीतांचा समावेश होता. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर या भैरवीने 'दिपसंध्या' कार्यक्रमाचा समारोप झाला. त्यांना तबल्यावर आकाश बडगे, उदगीर यांनी तर संवादिनीवर भालकी येथील विनायक चौधरी यांनी सुरेख साथसंगत केली. निवेदिका म्हणून सौ. अश्विनी देशमुख यांनी भूमिका पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्कार भारती समिती उदगीरचे अध्यक्ष सतीश उस्तुरे, मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्य उषा कुलकर्णी, डॉ. संजय कुलकर्णी, प्रदीप पत्तेवार, डॉ. मुकेश कुलकर्णी, प्रसाद जालनापुरकर यांनी पुढाकार घेतला होता.

टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा