जिल्हा परिषद आपल्या सोबत, नागरिकांनो स्वतःची काळजी घ्या - जि.प.अध्यक्ष राहूल केंद्रे लातूर / उदगीर (प्रतिनिधी) सगळे ठिक हाव का..? म्हणत प्रत्येक घराघरात आशाताई व इतर आरोग्य कर्मचारी नागरिकांची विचारपुस करताना पहावयास मिळत आहेत. तसेच, स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे आरोग्य केंद्रावर भेट देत परिस्थितीची पाहणी करत आहेत. दरम्याण, कूठे अनियमितता दिसली तर थेट कारवाई करत आहेत. अशात, नागरिकांनीही स्वतःची व परिवाराची दक्षता घेणे गरजेचे आहे. येणारे काही दिवस आपल्यासाठी खुप महत्वाचे आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी शहरात गेलेली जवळपास सगळी मंडळी आता गावात दाखल झाली आहेत. परंतु, त्यांच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोण खूपच संशयीत आहे. त्यामूळे बाहेरुन आलेल्या सर्वांनी आरोग्य कर्मचारी, आशाताई व इतर सर्व यंत्रणांना सहकार्य करावे, विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आलेल्या तसेच हातावर शिक्का मारलेल्या व्यक्तीनीं घालून दिलेल्या नियमांचे पालण करावे, जेणेकरुन संसर्ग होण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही. असे आवाहन लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे यांनी केले आहे. तसेच, सोशल मिडीयावरुन अफवा करु नका, संचारबंदी सुरु असल्याने घरात राहून पोलिसांना सहकार्य करा, कूठल्याही परिस्थितीत एकत्रित येण्याचे टाळा, आपले हात स्वच्छ धुवा, गरजेच्या ठिकाणी मास्क किंवा रुमालचा वापर करा, असे जनतेला आवाहन करत जिल्हा परिषद अध्यक्षांनी सर्व ग्रामसेवकांना व जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना आपापल्या सज्जावर पूर्णवेळ उपास्थित राहण्यास सांगीतले आहे. तसा, अधिकृत निर्णय त्यांना देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. शिवाय, प्रत्येक ग्रामपंचायतीने ऍन्टीव्हायरस लिक्वीडची एखादी फवारणी गावात करावी, सरपंच व कर्मचारी वर्गानी गावात राहून जनतेला धीर द्यावा, लोकांना सेनिटायझर्स, मास्कचे महत्व पटवून द्यावे, असेही सुचित करत कर्मचारी वर्गानी हलगर्जीपणा केला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. चौकट क्र. १ आपण आपल्या परिवाराची व स्वतःची काळजी करणे गरजेचे आहे. गंभीर व्हा, कृपया सहज घेऊ नका..! आलेले संकट आपण समजता त्यापेक्षा खूप मोठे आहे. १५ एप्रिल पर्यंत अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. केंद्र व राज्य सरकार आणि जिल्हा परिषेदेचा आरोग्य विभाग आपल्यासाठीच काम करत आहे. शासनाला व प्रशासनाला सहकार्य करा. आपण आहोत तर जग आहे, आणि कुटूंब आहे. राहूल केंद्रे अध्यक्ष, जिल्हा परिषद लातुर


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image