जिल्हा परिषद आपल्या सोबत, नागरिकांनो स्वतःची काळजी घ्या - जि.प.अध्यक्ष राहूल केंद्रे लातूर / उदगीर (प्रतिनिधी) सगळे ठिक हाव का..? म्हणत प्रत्येक घराघरात आशाताई व इतर आरोग्य कर्मचारी नागरिकांची विचारपुस करताना पहावयास मिळत आहेत. तसेच, स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे आरोग्य केंद्रावर भेट देत परिस्थितीची पाहणी करत आहेत. दरम्याण, कूठे अनियमितता दिसली तर थेट कारवाई करत आहेत. अशात, नागरिकांनीही स्वतःची व परिवाराची दक्षता घेणे गरजेचे आहे. येणारे काही दिवस आपल्यासाठी खुप महत्वाचे आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी शहरात गेलेली जवळपास सगळी मंडळी आता गावात दाखल झाली आहेत. परंतु, त्यांच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोण खूपच संशयीत आहे. त्यामूळे बाहेरुन आलेल्या सर्वांनी आरोग्य कर्मचारी, आशाताई व इतर सर्व यंत्रणांना सहकार्य करावे, विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आलेल्या तसेच हातावर शिक्का मारलेल्या व्यक्तीनीं घालून दिलेल्या नियमांचे पालण करावे, जेणेकरुन संसर्ग होण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही. असे आवाहन लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे यांनी केले आहे. तसेच, सोशल मिडीयावरुन अफवा करु नका, संचारबंदी सुरु असल्याने घरात राहून पोलिसांना सहकार्य करा, कूठल्याही परिस्थितीत एकत्रित येण्याचे टाळा, आपले हात स्वच्छ धुवा, गरजेच्या ठिकाणी मास्क किंवा रुमालचा वापर करा, असे जनतेला आवाहन करत जिल्हा परिषद अध्यक्षांनी सर्व ग्रामसेवकांना व जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना आपापल्या सज्जावर पूर्णवेळ उपास्थित राहण्यास सांगीतले आहे. तसा, अधिकृत निर्णय त्यांना देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. शिवाय, प्रत्येक ग्रामपंचायतीने ऍन्टीव्हायरस लिक्वीडची एखादी फवारणी गावात करावी, सरपंच व कर्मचारी वर्गानी गावात राहून जनतेला धीर द्यावा, लोकांना सेनिटायझर्स, मास्कचे महत्व पटवून द्यावे, असेही सुचित करत कर्मचारी वर्गानी हलगर्जीपणा केला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. चौकट क्र. १ आपण आपल्या परिवाराची व स्वतःची काळजी करणे गरजेचे आहे. गंभीर व्हा, कृपया सहज घेऊ नका..! आलेले संकट आपण समजता त्यापेक्षा खूप मोठे आहे. १५ एप्रिल पर्यंत अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. केंद्र व राज्य सरकार आणि जिल्हा परिषेदेचा आरोग्य विभाग आपल्यासाठीच काम करत आहे. शासनाला व प्रशासनाला सहकार्य करा. आपण आहोत तर जग आहे, आणि कुटूंब आहे. राहूल केंद्रे अध्यक्ष, जिल्हा परिषद लातुर


टिप्पण्या
Popular posts
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*