संचारबंदीच्या नियमांचे जनतेनी तंतोतंत पालन करावे : उपविभागीय अधिकारी मेगशेट्टी उदगीर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने संचारबंदी लागू केली असून कोरोना विषाणूचे गांभीर्य लक्षात घेऊन घराबाहेर न पडता संचारबंदीच्या नियमाचे पालन करावे अन्यथा कठोर कार्यवाही करण्याची वेळ येईल असा इशारा उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी यांनी दिला आहे. प्रशासनाने संचारबंदी जाहीर केली असताना उदगीर शहरातील काही टवाळखोर हे विनाकारण दुचाकी वाहणावरून बिनबोभाट बाहेर फिरत आहेत. लोकांना कितीही सांगितले तरी नागरिक काहीतरी निमित्त सांगून रस्त्यावर येत आहेत. शहरात सर्व अत्यावश्यक सुविधा कायम पुरविण्यात येणार असताना देखील अन्नधान्य खरेदी, मेडिकलच्या नावावर लोक बाहेर येत असल्याने प्रशासनाला कडक भूमिका घ्यायची वेळ येऊ देऊ नका असे आवाहन करीत जनतेनी प्रशासनास सहकार्य करावे व विनाकारण संचारबंदी काळात बाहेर फिरु नये असेही सांगितले. दि. २८ मार्चपासून भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेते याना जिल्हा परिषदेच्या प्रशालेच्या मैदानात जागा देण्यात येणार असून नागरिकांनी गर्दी न करता याच ठिकाणी येऊन भाजीपाला व फळे खरेदी करावीत असे आवाहनही उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी यांनी केले आहे.
Popular posts
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
• विक्रम लक्ष्मीकांत हलकीकर

डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
• विक्रम लक्ष्मीकांत हलकीकर

बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
• विक्रम लक्ष्मीकांत हलकीकर

डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
• विक्रम लक्ष्मीकांत हलकीकर

'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
• विक्रम लक्ष्मीकांत हलकीकर

Publisher Information
Contact
nilsamachar@gmail.com
9403012041
Brahman galli udgir
About
Share this page
Email
Message
Facebook
Whatsapp
Twitter
LinkedIn
addComments
टिप्पणी पोस्ट करा