शेतकऱ्यांना बांधावर खते व बियाणे उपलब्ध करून द्यावे - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शेतकऱ्यांना बांधावर खते व बियाणे उपलब्ध करून द्यावे
 - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 


निलंगा :देशभरात सुरू असणाऱ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर गरजेनुसार खत व बियाणे उपलब्ध करून द्यावे,त्याचे योग्य नियोजन केले जावे, अशी मागणी आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली आहे .आ. निलंगेकर यांनी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे .
शुक्रवारी (दि.२४ )व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून खरीप हंगामपूर्व बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यातील खासदार व आमदारांना यासाठी बोलावण्यात आले होते. परंतु या बैठकीत खासदार ,आमदार ,मंत्री व अधिकाऱ्यांचा सुसंवाद होऊ शकला नाही. त्यामुळेच या प्रकारबद्दल नाराजी व्यक्त करत आ.निलंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन ही मागणी केली.
 पुढील काळात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या व्यक्तींचे नियमानुसार कोरोंटाईन  करावे ,अशी मागणी करतानाच लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या प्रयत्नातून जिल्हा कोरोना मुक्त झाल्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले.
 पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना रासायनिक खते व बियाणाची गरज आहे .कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून खत व बियाणे बांधावर उपलब्ध करून द्यावे .जिल्ह्यातील काही तालुके राज्याच्या सीमेलगत असल्यामुळे बोगस खते व बियाणांचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी. बोगस खते व बियाणे उत्पादन करणाऱ्यावर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना वेळेत खत व बियाणे उपलब्ध करून द्यावे.खरीप व रब्बी हंगामात तूर व हरभऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे .या शेतमालाची खरेदी करण्यासाठी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावीत. निलंगा विधानसभा मतदारसंघातून मांजरा व तेरणा या दोन नद्या वाहतात. शेतजमीन चांगली आहे .त्यासाठी ७१ हजार ९६० मेट्रिक टन खत व ८६ हजार ७६६ क्विंटल बियाणे आवश्यक असून ते शेतकऱ्यांना वेळेत उपलब्ध करून द्यावे ,अशी मागणीही आ. निलंगेकर यांनी केली आहे.


टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा