लॉकडाउनच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याशिवाय अन्य पर्याय नाही पालकमंत्री अमित देशमुख

लॉकडाउनच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याशिवाय अन्य पर्याय नाही         


 पालकमंत्री अमित देशमुख 
लातूर,  - लातूर जिल्हा  कोविड-19 मुक्त आहे आणि हे स्वरूप आपणाला यापुढेही असेच कायम ठेवावयचे असल्याने जेथे लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केले जात नाही तेथे  कठोरपणे कारवाई करण्यापलीकडे अन्य पर्याय उरणार नाही असा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिला आहे.
 कोविड -19 विरुद्धचा लढा आपणाला जिंकावयाचा असल्याने अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये. अतिशय गरज असल्यास कुटुंबातील केवळ एकाच सदस्याने बाहेर पडावे आणि जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्य सेवेवरील ताण कमी करावा असे आवाहन  पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.
 लातूर जिल्हा कोविड-19 मुक्त राखण्याचे श्रेय लातुरकर  नागरिकांना आहे असे सांगून जिल्ह्याचे हे स्वरूप आपणाला असेच ठेवावयाचे असल्याने कोणत्याही परिस्थितीत कोविड -19 चा प्रादुर्भाव जिल्ह्यात होणार नाही यासाठी जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांनी अधिक काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना त्यांना दिल्याचे सांगून यामुळे कोणाचीही गैरसोय होणार नाही असेही पालक मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
 जनतेने अत्यावश्यक कामाशीवाय घराबाहेर पडू नये, कुठेही अनावश्यक गर्दी करू नये, सर्वत्र सामाजिक अंतर पाळावे. या कालावधीत दवाखाने, औषधाची दुकाने,  किराणा दुकाने, रास्त भाव दुकाने या व अन्य अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार असल्याने याठिकाणीही सामाजिक अंतर काटेकोरपणे राखले जावे याची दक्षता घ्यावी, घरीच राहाल तर सुखी राहाल आणि तसे झाले तरच कोविड विरुद्ध सुरू असलेला हा लढा जिंकणे साध्य होणार असल्याने जनतेने साथ द्यावी असेही पालकमंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image