शहरातील संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला मदत करावी. राज्यमंत्री संजय बनसोडे 

शहरातील संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला मदत करावी.
राज्यमंत्री संजय बनसोडे
उदगीर: शहरात  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन  प्रयत्न करीत आहे. या परिस्थितीत सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे  कोणत्याही अफवावर विश्वास ठेऊ नये , या कठीण प्रसंगी सामाजिक सलोखा राखावा असे आवाहन राज्याचे पर्यावरण राज्य मंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे.
उदगीर शहरात आज आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने,वैद्यकीय उपसंचालक डॉ एकनाथ माले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ  संजय ढगे उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी, उप अधीक्षक श्री जवळकर,तहसीलदार व्यंकटेश मुंडे, इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले की  उदगीर शहरात कोरोना संक्रमित रूग्ण आढळले आहेत त्या भागातील पन्नास वर्षी वरील मधुमेह, रक्तदाब असणाऱ्या सर्व नागरीकाचे स्वँब तपासणी करण्यात येणार आहेत. या भागातील संपर्कात आलेल्या नागरिकांच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. शहरातील हा  परिसर मागील तीन दिवसा पासून सील करण्यात आला आहे या परिस्थितीत नागरिकांना लागणार्या जीवन आवश्यक वस्तू घरपोच देण्यात येणार आहेत  यासाठी नगरपालिकेनी हेल्पलाईन व विशिष्ट नंबर उपलब्ध करून दिले आहेत. तसेच अन्य रुग्णांना  दोन रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत
 विलगीकरण कक्षात ठेवलेल्या नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील या ठिकाणी कँन्सलर ची  नेमनुक करण्यात येईल. यावेळी नागरिकांना सर्व जीवन आवश्यक वस्तुचा पुरवठा करण्याच्या सुचना 
यावेळी प्रशासनाला देण्यात आले आहेत अशी माहिती राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image