धन्वंतरी आयुर्वेदिक कॉलेजच्या वतीने पीएम केअर्स फंडात दोन लाख तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक लाख रुपयांची रक्कम जमा*

*धन्वंतरी आयुर्वेदिक कॉलेजच्या वतीने पीएम केअर्स फंडात दोन लाख तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक लाख रुपयांची रक्कम जमा*


उदगीर:-कोरोना विषाणू संसर्गा मुळे निर्माण झालेल्या जागतिक महामारीच्या संकटाला धीरोदात्तपणे सामोरे जाण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून व मानवता धर्माचे पालन करीत राष्ट्रीय उत्तरदायित्व पार पाडताना तन-मन-धनाने प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापन व साथरोग नियंत्रणासाठी आर्थिक सहाय्य म्हणून बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ,अहमदपूर द्वारा संचलित धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर, जि.लातूर यांच्या वतीने प्रधानमंत्री केअर फंडामध्ये दोन लाख रुपये तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये एक लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली.
उदगीर विधानसभेचे पंधरा वर्ष व अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे पाच वर्षे महाराष्ट्र विधानसभेत प्रभावीपणे प्रतिनिधित्व करणारे व महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून सबंध महाराष्ट्रात अनेक विधायक व समाजोपयोगी कार्य करणारे संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र विधानसभेत दुसर्‍यांदा प्रतिनिधित्व करणारे व लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी अहोरात्र झटणारे लोकाभिमुख व अभ्यासू व्यक्तिमत्त्व आमदार तथा संस्थेचे सचिव बाबासाहेब पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण महर्षी भगवानसिंह बायस गुरुजी, सकारात्मक तथा दुरदृष्टीकोनातुन नियोजनबद्ध काम करणारे संस्थेचे सहसचिव अविनाश जाधव आणि संचालक मंडळातील अन्य सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या वतीने सदरील निधी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करून खात्यात जमा झालेल्या चेकची व पावतीची सत्यप्रत उदगीरचे उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी व तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना महाविद्यालयाचे प्राचार्य तथा रुग्णालय अधीक्षक डॉ.दत्तात्रय विनायकराव पाटील यांनी सुपूर्द केली.
कोरोना विषाणू संसर्ग झालेले पॉझिटिव्ह रुग्ण किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या संशयित व्यक्तींसाठी म्हणजेच माइल्ड, मॉडरेट व सिव्हीअर अशा तिन्ही प्रकारच्या केसेस मध्ये काॅरेनटाईन व आयसोलेशन साठी अनिवार्य असलेली अत्यावश्यक औषधी-उपकरणे व तसेच प्रसंगी स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात घालून अत्यंत निस्वार्थ व निरपेक्ष भावनेतून कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांची चिकित्सा करणारे तज्ञ डॉक्टर्स,महसूल,पोलीस,ईत्यादी शासकीय-निमशासकीय-खाजगी-स्वयंसेवी यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी,पॅरामेडिकल व नॉन टेक्निकल कर्मचारी यांना संसर्गापासुन संरक्षण मिळावे व त्यांचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी कोवीड -19 मास्क, पीपीई किट,ग्लोव्हज, सॅनिटायझर,ईत्यादी आवश्यक सोयीसुविधांची उपलब्धता करण्याकरीता रक्कम उपयोगी पडेल जेणेकरून मानवसेवा हिच ईश्वरसेवा हा उदात्त हेतू साध्य होईल व कोरोना विषाणू संसर्गामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण सुद्धा कमी होण्यास मदत होईल या सद्भावनेपोटी सदरील रक्कम देणगी स्वरूपात देण्यात आली आहे. सद्यस्थितीत सामान्य रुग्णालय,उदगीर च्या दैनंदिन रुग्णसेवेचे स्थलांतर धन्वंतरी आयुर्वेदिक कॉलेज मध्ये करण्यात आले असून रुग्ण तपासणी व औषधोपचार सुरळीत पणे सुरू आहे.भविष्यातही कोरोना विषाणू संसर्गाच्या भयावह समस्येला तोंड देण्यासाठी प्रशासनाला महाविद्यालय व रुग्णालयाच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका असेल अशी माहिती डाॅ.दत्तात्रय वि.पाटील यांनी यावेळी बोलताना दिली. 
या प्रसंगी महसुल विभागाचे अन्य अधिकारी तथा कर्मचारी व तसेच धन्वंतरी अायुर्वेदिक मेडीकल कॉलेज अॅन्ड चॅरिटेबल हाॅस्पीटल,उदगीर, जि.लातूरचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image