धन्वंतरी आयुर्वेदिक कॉलेजच्या वतीने पीएम केअर्स फंडात दोन लाख तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक लाख रुपयांची रक्कम जमा*

*धन्वंतरी आयुर्वेदिक कॉलेजच्या वतीने पीएम केअर्स फंडात दोन लाख तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक लाख रुपयांची रक्कम जमा*


उदगीर:-कोरोना विषाणू संसर्गा मुळे निर्माण झालेल्या जागतिक महामारीच्या संकटाला धीरोदात्तपणे सामोरे जाण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून व मानवता धर्माचे पालन करीत राष्ट्रीय उत्तरदायित्व पार पाडताना तन-मन-धनाने प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापन व साथरोग नियंत्रणासाठी आर्थिक सहाय्य म्हणून बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ,अहमदपूर द्वारा संचलित धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर, जि.लातूर यांच्या वतीने प्रधानमंत्री केअर फंडामध्ये दोन लाख रुपये तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये एक लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली.
उदगीर विधानसभेचे पंधरा वर्ष व अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे पाच वर्षे महाराष्ट्र विधानसभेत प्रभावीपणे प्रतिनिधित्व करणारे व महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून सबंध महाराष्ट्रात अनेक विधायक व समाजोपयोगी कार्य करणारे संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र विधानसभेत दुसर्‍यांदा प्रतिनिधित्व करणारे व लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी अहोरात्र झटणारे लोकाभिमुख व अभ्यासू व्यक्तिमत्त्व आमदार तथा संस्थेचे सचिव बाबासाहेब पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण महर्षी भगवानसिंह बायस गुरुजी, सकारात्मक तथा दुरदृष्टीकोनातुन नियोजनबद्ध काम करणारे संस्थेचे सहसचिव अविनाश जाधव आणि संचालक मंडळातील अन्य सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या वतीने सदरील निधी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करून खात्यात जमा झालेल्या चेकची व पावतीची सत्यप्रत उदगीरचे उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी व तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना महाविद्यालयाचे प्राचार्य तथा रुग्णालय अधीक्षक डॉ.दत्तात्रय विनायकराव पाटील यांनी सुपूर्द केली.
कोरोना विषाणू संसर्ग झालेले पॉझिटिव्ह रुग्ण किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या संशयित व्यक्तींसाठी म्हणजेच माइल्ड, मॉडरेट व सिव्हीअर अशा तिन्ही प्रकारच्या केसेस मध्ये काॅरेनटाईन व आयसोलेशन साठी अनिवार्य असलेली अत्यावश्यक औषधी-उपकरणे व तसेच प्रसंगी स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात घालून अत्यंत निस्वार्थ व निरपेक्ष भावनेतून कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांची चिकित्सा करणारे तज्ञ डॉक्टर्स,महसूल,पोलीस,ईत्यादी शासकीय-निमशासकीय-खाजगी-स्वयंसेवी यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी,पॅरामेडिकल व नॉन टेक्निकल कर्मचारी यांना संसर्गापासुन संरक्षण मिळावे व त्यांचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी कोवीड -19 मास्क, पीपीई किट,ग्लोव्हज, सॅनिटायझर,ईत्यादी आवश्यक सोयीसुविधांची उपलब्धता करण्याकरीता रक्कम उपयोगी पडेल जेणेकरून मानवसेवा हिच ईश्वरसेवा हा उदात्त हेतू साध्य होईल व कोरोना विषाणू संसर्गामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण सुद्धा कमी होण्यास मदत होईल या सद्भावनेपोटी सदरील रक्कम देणगी स्वरूपात देण्यात आली आहे. सद्यस्थितीत सामान्य रुग्णालय,उदगीर च्या दैनंदिन रुग्णसेवेचे स्थलांतर धन्वंतरी आयुर्वेदिक कॉलेज मध्ये करण्यात आले असून रुग्ण तपासणी व औषधोपचार सुरळीत पणे सुरू आहे.भविष्यातही कोरोना विषाणू संसर्गाच्या भयावह समस्येला तोंड देण्यासाठी प्रशासनाला महाविद्यालय व रुग्णालयाच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका असेल अशी माहिती डाॅ.दत्तात्रय वि.पाटील यांनी यावेळी बोलताना दिली. 
या प्रसंगी महसुल विभागाचे अन्य अधिकारी तथा कर्मचारी व तसेच धन्वंतरी अायुर्वेदिक मेडीकल कॉलेज अॅन्ड चॅरिटेबल हाॅस्पीटल,उदगीर, जि.लातूरचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज