कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने हमाल बांधवाना अन्नधान्याचे वाटप सभापती सिद्धेश्वर पाटील यांचा पुढाकार : राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते वाटप

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने हमाल बांधवाना अन्नधान्याचे वाटप
सभापती सिद्धेश्वर पाटील यांचा पुढाकार :
राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते वाटप
• उदगीर : कोरोना प्रादुर्भावामुळे देशात लागू केलेल्या लोकडाऊन मुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील हमाल बांधवावर उपासमारीची वेळ आली आहे, ही बाब लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने या हमाल बांधवाना अन्नधान्याचे वाटप राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
• यावेळी बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, सिद्धेश्वर पाटील, रामराव बिरादार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. व्यंकट बेद्रे, तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, उपविभागीय प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर जवळकर, पोलीस निरीक्षक महेश शर्मा, बाजार समितीचे संचालक शिरीषकुमार पाटील, संजय पवार, धनाजी जाधव, संतोष बिरादार, गौतम पिंपरे, पद्माकर उगीले, सुभाष धनुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर शेख आदी उपस्थित होते.
• उदगीर हे महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगाणा या तीन राज्याच्या सीमेवर वसलेले शहर असून मोठी बाजारपेठ आहे. मराठवाड्यात अग्रगण्य बाजार समितीमध्ये उदगीरच्या बाजार समितीचा उल्लेख केला जातो. या बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात आडत व्यापारी असून त्यांच्याकडे काम करणाऱ्या हमालाची संख्याही मोठी आहे. 
• कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या दहा दिवसापूर्वी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा फटका उदगीरच्या बाजार समितीतील हमालानाही बसला आहे. गेल्या दहा दिवसापासून बाजार बंद असल्यामुळे हमाल बांधवावर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेऊन बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील यांनी बाजार समितीच्या वतीने हमाल बांधवांसाठी अन्नधान्य वाटपाचा निर्णय घेतला. गहू, तांदूळ, साखर, तूरडाळ, चहापत्ती, साबण, तेल आदी जीवनावश्यक साहित्य आज राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते देण्यात आले.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image