लॉकडाऊन कालावधी वाढीनंतर राज्याची तीन झोन मध्ये विभागणी लातूर जिल्ह्याचा ऑरेंज झोनमध्ये समावेश

लॉकडाऊन कालावधी वाढीनंतर राज्याची तीन झोन मध्ये विभागणी
लातूर जिल्ह्याचा ऑरेंज झोनमध्ये समावेश
उदगीर : राज्यसरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन चा कालावधी 30 एप्रिल पर्यंत वाढविल्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येनुसार राज्याची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये लातूर जिल्ह्याचा समावेश ऑरेंज झोनमध्ये करण्यात आला आहे.
कोरोना आजाराचे रुग्ण वाढत असतानाच गेल्या तीन आठवड्यापूर्वी राज्यात व देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या काळात जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. शिवाय राज्यातील वाहतूकही पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मदत झाली. परंतु कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट होण्याऐवजी दररोज वाढ होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन चा कालावधी संपण्याच्या अगोदरच हा कालावधी आणखी दोन आठवड्यासाठी वाढवत असल्याचे जाहीर केले. राज्य सरकारने हा कालावधी वाढविल्यानंतर राज्याची तीन विभागात विभाजन करण्यात आले आहे. रेड, ऑरेंज व ग्रीन अशा तीन विभागात हे विभाजन करण्यात आले असून ज्या जिल्ह्यात पंधरापेक्षा जास्त रुग्ण असतील त्या जिल्ह्याचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. या विभागातील जिल्ह्यात लॉकडाऊन चालू राहत असतानाच निर्बंध कठोर करण्यात येणार आहेत. ज्या जिल्ह्यात पंधरा पेक्षा कमी रुग्ण आहेत त्या जिल्ह्याचा समावेश ऑरेंज झोनमध्ये करण्यात आला आहे. या जिल्ह्याच्या सीमा बंद ठेवून निर्बन्ध कमी होणार आहेत. शिवाय वाहतुकीत थोडीफार सवलत मिळणार आहे. तर ज्या जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही अशा जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आले आहेत. या जिल्ह्यातील लॉकडाऊनचे नियम टप्प्याटप्प्याने हटविले जाणार असून जनजीवनही लवकरच पूर्वपदावर आणले जाईल.
लातूर जिल्ह्यात निलंगा येथे गेल्या आठवड्यात सापडलेल्या रुग्णामध्ये आठजण पॉझिटिव्ह निघाले होते. त्यांना कोरंटाईनमध्ये ठेवून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे आठ पॉझिटिव्हचे रुग्ण जिल्ह्यात आढळून आल्याने या जिल्ह्याचा समावेश ऑरेंज झोनमध्ये करण्यात आला आहे.


रेड झोन जिल्हे– मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, नागपूर, रायगड, सांगली आणि औरंगाबाद


ऑरेंज झोन जिल्हे- रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि गोदिंया


ग्रीन झोन- धुळे, नंदुरबार, परभणी, सोलापूर, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भांडारा आणि गडचिरोली


 


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image