श्यामार्य कन्या विद्यालयात ई लर्निंग चा उत्साहपूर्ण प्रतिसाद

श्यामार्य कन्या विद्यालयात ई लर्निंग चा उत्साहपूर्ण प्रतिसाद


     उदगीर: सद्यस्थितीत पुर्ण भारत देश पर लॉक डाऊन असल्यामुळे शासनाच्या परिपत्रका प्रमाणे व मा. शिक्षणाधिकारी उकिरडे साहेब यांच्या आव्हानास  अनुसरून श्यामार्य कन्या विद्यालय उदगीर द्वारा "लर्निंग फ्रॉम होम " चे क्लासेस सुरुवात करण्यात आलेले आहेत .यामध्ये सर्व पालकांनी व विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण वातावरणात प्रतिसाद दिलेला आहे .एप्रिल महिन्यातच इयत्ता दहावी या वर्गाचे ज्यादा वर्ग सुरुवात होतात ,पण लॉक डाऊन या परिस्थितीमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर वर्ग दहावीचे जादा वर्ग घेऊ शकलेले नाहीत. तरीसुद्धा शासनाने सांगितलेल्या परीपत्रकाप्रमाणे श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था संचलित श्यामार्य कन्या विद्यालयात 'ई लर्निंग फ्रॉम होम'एप्रिल महिन्यापासून चालू करण्यात आलेले आहेत. यास भरभरून असा प्रतिसाद सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी दिलेला आहे
      श्यामार्य कन्या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री बैले  व्ही डी  यांनी वर्ग पाचवी ते दहावी सर्व वर्गाचे व्हाट्सअप ग्रुप तयार करून ई लर्निंग चे  वर्ग घेण्यात येत आहेत .लहान वयोगटातून सुद्धा भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे .
        प्रोजेक्ट मध्ये सर्व शासकीय नियमाचे पालन करून व शासनाच्या सर्व जी.आर .चे वाचन करून नियमबद्ध व सूत्रबद्ध नियोजन केले आहे कारण आपल्याजवळ असणाऱ्या उपलब्ध साधन सामुग्रीचा उपयोग करून घेणे हे आवश्यक आहे.  बदल हा निसर्गाचा नियम आहे या उक्तीप्रमाणे आपण सर्व शिक्षकांनी हा बदल स्वीकारावा व परिस्थितीनुसार स्वःताला अपडेट करून, एकरूप होऊन विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विविध योजना व नव उपक्रम राबवायलाच हवे. प्रोजेक्ट राबवण्यासाठी आवश्यक साधने :- (यापैकी कोणतेही दोन) १.सर्व शिक्षकांचे ई- मेल असणे आवश्यक आहे . २.सर्व  शिक्षकांकडे संगणक असणे आवश्यक आहे .३.सर्व  शिक्षकांकडे २ जी.बी. क्षमतेचा पेन ड्राईव्ह असणे आवश्यक आहे . ४.सर्व शिक्षकांकडे अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक आहे त्यात इंटरनेट असणे आवश्यक आहे  ५.सर्व  शिक्षकांनी  किमान M.S.C.I.T पर्यंत संगणकीय शिक्षण घेणे आवश्यक आहे .  असे मत श्यामार्य कन्या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक  श्री बैले व्ही डी यांनी मांडले. सर्व शिक्षक बंधु भगिनी या उपक्रमासाठी अविरतपणे कष्ट घेत असल्याने  श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री सुपोषपाणी आर्य, सहसचिव अंजुमनीताई आर्य ,सचिव श्री संकाये साहेब ,उपाध्यक्ष श्री मुंडकर साहेब ,यांनी ई लर्निंग मध्ये  सहभागी असलेल्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image