मुबलक पाणी साठा असताना निलंग्यात 15 दिवसाला पाणी पुरवठा : रस्त्यांची अवस्था दयनीय असल्याचे शरद पवार विचार मंचचे निवेदन

मुबलक पाणी साठा असताना निलंग्यात 15 दिवसाला पाणी पुरवठा : रस्त्यांची अवस्था दयनीय असल्याचे शरद पवार विचार मंचचे निवेदन



निलंगा : शहराला पाणी पुरवठा करणाया माकणी धरणात मुबलक पाणी साठा असतानाही शहरातील नागरिकांना 15 दिवसाला पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार करीत शहरातील रस्त्यांची अवस्थाही दयनीही झाल्याचे निवेदन शरद पवार विचार मंचच्या वतीने उपविभागीय अधिकायांना देण्यात आले आहे. 


 शहराला पाणी पुरवठा करणाया माकणी धरणात मुबलक पाणी साठा उपलब्ध असुनही नगरपरिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहराला 8 दिवसातुन एकदा मिळणारे पाणी 15 ते 17 दिवसातुन एकदाच मिळत आहेत यामुळे लाँकडाऊन मध्ये घरी अडकलेली सर्व सामान्य जनता घरीच असल्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. नविन पाईपलाईन साठी खोदलेले रस्ते असुन अडचण नसुन खोळंबा आहेत. येणारा पावसाळा लक्षात घेता शहरातील जनतेला चिखलातुनच जावे लागणार ,कचरा वेळेवर उचलला जात नाही,नाली सफाई बंद आहे यामुळे घाणीचे सामार्ज्य भरपुर प्रमाणात वाढले आहे या कडे नगर पालिका चे पुर्णपणे दुर्लक्ष आहे. या मुळ गरजा वेळेवर भेटत नसल्यामुळे शहरातील जनता त्रस्त झाली आहे. उपविभागीय अधिकारी यांनी याप्रकरणी लक्ष घालून शहरातील जनतेची त्रासातून मुक्तता करावी अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा शरद पवार विचार मंच च्या वतीने देण्यात आला. ग्रामीण भागातही बोअर, विहिरी अधिगृहण कस्र्न पाण्याची सोय करावी असेही निवेदनात म्हणले आहे.


 या निवेदनात  शरद पवार विचार मंच तालुकाध्यक्ष सुधीर मसलगे,तालुका उपाध्यक्ष अंगद जाधव, शहराध्यक्ष धम्मानंद काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मीडीया सेलचे प्रदेश सरचिटणीस किरण सोळुंके, वकील सेलचे तालुकाध्यक्ष अॅड. गोपाळ इंगळे, गफ्फार लालटेकडे,संदिप मोरे ,राम पाटील, रा. कॉ. किसान सेलेचे जिल्हा सरचिटणीस सुरेश रोळे, राजकुमार माने,लक्ष्मण क्षीरसागर, पंढरी पाटील, विकास ढेरे, मोरे, बालाजी शिंदे दयानंद मोरे आदीसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत.


 


 


 


 



टिप्पण्या
Popular posts
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज
लातूर लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान ; 19 लाखापेक्षा अधिक मतदार संख्या • जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू • मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविणार : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे
इमेज
आंध्र प्रदेशातील विद्यार्थांना उदगीरच्या निवारा केंद्राचा आधार नगराध्यक्ष बागबंदे यांची तत्परता : घरी पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू उदगीर: उदगीरच्या रेल्वे पटरीवरुन काही विध्यार्थ्यांचा ग्रुप हैदराबादकडे पायी जात असल्याची माहिती मिळताच तत्परता दाखवीत उदगीरचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी या विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात असल्याचे नगराध्यक्ष बागबंदे यांनी सांगितले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम व शेजारच्या जिल्ह्यातील 16 विद्यार्थी उदगीर येथील ऍग्रीकल्चर ट्रेनिंग सेंटर येथे ट्रेनिंग घेत असत. शहरातील एस. टी. कॉलनी भागात एकत्र होस्टेलवर रहायला होते. सध्या देशभरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढला असून तो प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय झाली. देशात कोरोना विषाणूंमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चिंतेपोटी विद्यार्थ्यांना गावाकडे परत येण्याचा आग्रह धरला होता. एकीकडे पालकांचा आग्रह तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे परत जाण्यासाठी कसलीच सोय नसल्याने विद्यार्थी चिंतेत सापडले होते. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित विचार करून पायी गावाकडे जाण्याची तयारी केली. आपले सामान खांद्यावर घेऊन रेल्वे पटरी मार्गाने हे सर्व विद्यार्थी गावाकडे जायला निघाले. भाजपाच्या कार्यकर्त्यास हे लक्षात आल्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे रयांच्याशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनंती केली. नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी तात्काळ माणुसकीच्या भावनेतून तत्परता दाखवित रोटी कपडा बँकेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची उदगीर नगर परिषदेने बांधलेल्या निवारा केंद्रात राहण्याची व जेवणाची सोय केली. शिवाय या विद्यार्थ्यांची त्यांच्या गावी परत जाण्यासाठी सर्व ती मदत करणार असल्याचे सांगत त्यांच्या जाण्याची सोय होइपर्यंत या सर्व विद्यार्थ्यांची या निवारा केंद्रात सर्व सोय करण्याच्या सूचना संबंधितांना देऊन नगराध्यक्षांनी वैयक्तिक पाच हजार रुपये या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी दिले. यावेळी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना हात मास्क व सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सुधीर भोसले, नगरसेवक मनोज पुदाले, रामचंद्र मुक्कावार, अॅड. दत्ताजी पाटील, अॅड. सावन पस्तापुरे, रामेश्वर पवार, रोटी कपडा बँकेचे खुर्शीद आलम व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान नगरसेवक अॅड. दत्ताजी पाटील यांनी श्रीकोलमच्या प्रशासनासोबत या विद्यार्थ्यांचा संवाद साधून दिला.
इमेज
*राष्ट्रपतीच्या दौऱ्यासाठी उदगीर नगरी सज्ज*
इमेज
उदगीरच्या दूध डेअरीसंदर्भात लवकरच एन डी डी बी च्या अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक
इमेज