मुबलक पाणी साठा असताना निलंग्यात 15 दिवसाला पाणी पुरवठा : रस्त्यांची अवस्था दयनीय असल्याचे शरद पवार विचार मंचचे निवेदन

मुबलक पाणी साठा असताना निलंग्यात 15 दिवसाला पाणी पुरवठा : रस्त्यांची अवस्था दयनीय असल्याचे शरद पवार विचार मंचचे निवेदन



निलंगा : शहराला पाणी पुरवठा करणाया माकणी धरणात मुबलक पाणी साठा असतानाही शहरातील नागरिकांना 15 दिवसाला पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार करीत शहरातील रस्त्यांची अवस्थाही दयनीही झाल्याचे निवेदन शरद पवार विचार मंचच्या वतीने उपविभागीय अधिकायांना देण्यात आले आहे. 


 शहराला पाणी पुरवठा करणाया माकणी धरणात मुबलक पाणी साठा उपलब्ध असुनही नगरपरिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहराला 8 दिवसातुन एकदा मिळणारे पाणी 15 ते 17 दिवसातुन एकदाच मिळत आहेत यामुळे लाँकडाऊन मध्ये घरी अडकलेली सर्व सामान्य जनता घरीच असल्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. नविन पाईपलाईन साठी खोदलेले रस्ते असुन अडचण नसुन खोळंबा आहेत. येणारा पावसाळा लक्षात घेता शहरातील जनतेला चिखलातुनच जावे लागणार ,कचरा वेळेवर उचलला जात नाही,नाली सफाई बंद आहे यामुळे घाणीचे सामार्ज्य भरपुर प्रमाणात वाढले आहे या कडे नगर पालिका चे पुर्णपणे दुर्लक्ष आहे. या मुळ गरजा वेळेवर भेटत नसल्यामुळे शहरातील जनता त्रस्त झाली आहे. उपविभागीय अधिकारी यांनी याप्रकरणी लक्ष घालून शहरातील जनतेची त्रासातून मुक्तता करावी अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा शरद पवार विचार मंच च्या वतीने देण्यात आला. ग्रामीण भागातही बोअर, विहिरी अधिगृहण कस्र्न पाण्याची सोय करावी असेही निवेदनात म्हणले आहे.


 या निवेदनात  शरद पवार विचार मंच तालुकाध्यक्ष सुधीर मसलगे,तालुका उपाध्यक्ष अंगद जाधव, शहराध्यक्ष धम्मानंद काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मीडीया सेलचे प्रदेश सरचिटणीस किरण सोळुंके, वकील सेलचे तालुकाध्यक्ष अॅड. गोपाळ इंगळे, गफ्फार लालटेकडे,संदिप मोरे ,राम पाटील, रा. कॉ. किसान सेलेचे जिल्हा सरचिटणीस सुरेश रोळे, राजकुमार माने,लक्ष्मण क्षीरसागर, पंढरी पाटील, विकास ढेरे, मोरे, बालाजी शिंदे दयानंद मोरे आदीसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत.


 


 


 


 



टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा