30 एप्रिल रोजी प्रलंबित असलेल्या 45 पैकी एक अहवाल पॉझिटिव्ह, तर 42 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह व दोन व्यक्तींच्या अहवालाची पुनर्तपासणी होणार

30 एप्रिल रोजी प्रलंबित असलेल्या 45 पैकी एक अहवाल पॉझिटिव्ह, तर 42 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह व दोन व्यक्तींच्या अहवालाची पुनर्तपासणी होणार


* 1 मे रोजी चे उदगीर येथील 29 पैकी 27 अहवाल निगेटिव्ह तर 2 व्यक्तींचे अहवालाची पुनर्तपासणी होणार



लातूर,:- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत दिनांक 30 एप्रिल 2020 रोजी एकूण 45 व्यक्तींच्या स्वॅबची कोविड-19 ची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 42 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 03 व्यक्तीचे अहवाल प्रलंबित होते. प्रलंबित तीन आवाहल पैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून दोन व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले असल्यामुळे त्यांची 48 तासानंतर पुनर्तपासणी करण्यात येणार आहे, 
अशी माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली आहे.
आज दिनांक 01 मे 2020 रोजी एकूण 53 व्यक्तींचे स्वॅब (कोविड 19) तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत आले होते. त्यापैकी उदगीर येथील 29 व्यक्तीचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 27 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 2 व्यक्तीचे अहवाल Inconclusive आले असल्यामुळे त्यांची 48 तासानंतर पुनर्तपसणी करण्यात येणार आहे. तसेच उस्मानाबाद येथील 20, अंबाजोगाई येथील 2 व लातूर येथील 2 व्यक्तीचे स्वॅब तपासणी साठी आले होते त्या सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत वैद्यकीय विज्ञान संस्थेकडे कोणताही अहवाल प्रलंबित नाही अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.


टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज