लातूर जिल्ह्यातील सर्व वाईन शॉप 5 मे पासून पुढील आदेशापर्यंत बंद जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

लातूर जिल्ह्यातील सर्व वाईन शॉप 5 मे पासून पुढील आदेशापर्यंत बंद
जिल्हाधिकारी जी. श्रीकांत


लातूर:- राज्यशासनाने लॉक डाऊन च्या तिसऱ्या टप्प्यात ऑरेंज झोनमधील जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय व इतर आस्थापनांना काही प्रमाणात शिथिलता देण्यात आलेली होती. त्यानुसार ऑरेंज झोन मध्ये असलेल्या लातूर जिल्ह्यातील वाईन शॉप सुरू करण्याची दिनांक 04 मे 2020 पासून जिल्हा प्रशासनाने मुभा दिली होती. मात्र दि. 04 मे 2020 रोजी लातूर मधील वाईन शॉप वर सोशल डिस्टन्सचे ( सामाजिक आंतर) पालन होत नसल्याचे दिसून आले.व त्यातून कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने दिनांक 5 मे 2020 पासून जिल्ह्यातील सर्व वाईन शॉप बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.
लातूर जिल्ह्यातील सर्व वाईन शॉप पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचा निर्णय लातूर जिल्हा प्रशासनाने घेतला असून दि. 04 मे 2020 रोजी रात्री त्याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास वाईन शॉप परवानाधारक आणि तेथे विनाकारण गर्दी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश ही जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिलेत. 


टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज