*आरोग्य आणि शेती प्रश्नासंदर्भात लोकप्रतिनिधीची तात्काळ बैठक घ्यावी* *भाजपाची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी*

*


लातूर: आरोग्य आणि शेतीच्या प्रश्न बाबत तातडीने चर्चा करणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीची तात्काळ बैठक घेण्यात यावी अशी मागणी जिल्हा भाजपाच्या वतीने लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.


लातूर जिल्ह्यात कोरोना मोठे रूप धारण केले असून दिवसेंदिवस कोरोना चे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर मान्सून अगदी काही दिवसावर आल्याने शेतकऱ्यांना लागणारे खत बी बियाणे वेळेवर आणि गरजेनुसार मिळणे आवश्यक आहे. मात्र बाजारात खत आणि बियाण्याची अधिकच्या भावाने विक्री होत होत असल्याने गळेच काळाबाजार रोखण्यासाठी ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे यासाठी आरोग्य आणि शेतीच्या प्रश्न बाबत तातडीने चर्चा करणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीची तात्काळ बैठक घेण्यात यावी, अशी मागणी भाजपाच्या वतीने लेखी पत्राद्वारे माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड, खा. सुधाकर शृंगारे, आ. अभिमन्यू पवार, जि.प. चे अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्ष भारतबाई साळुंखे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. 


टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा