खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बि -बियाणे ,खते वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्यमंत्री संजय बनसोडे

रीप हंगामासाठी शेतकऱ्यांना  बि -बियाणे ,खते वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश  
             राज्यमंत्री संजय बनसोडे 
 उदगीर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील शेतीच्या खरीप हंगामात खते,बि बियाणे वेळेत व शेतकऱ्यांना बाधांवर उपलब्ध करून देण्यासंदर्भात नियोजन करण्याचे निर्देश उदगीरचे आमदार तथा राज्याचे पर्यावरण पाणी पुरवठा,राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.
खरीप हंगामसाठी उपलब्ध असलेल्या खते , बि बियाणे यांचा साठा पुढील काळात करण्यात येणारा पुरवठा या बाबत उदगीर येथे आढावा बैठक राज्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात  आली होती. या बैठकीस  जि.प.अघ्यक्ष राहुल केंद्रे.अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण  कृषी अधिकारी  महेश तीर्थकर, तालुका कृषी अधिकारी सिध्देश्वर मोकळे, तालुका कृषी अधिकारी सातपुते यांच्या सह कृषी सहाय्यक, शेतकरी व कृषी साहित्य विक्रेते उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आगामी काळात आपल्या गावातच,बाधांवर बी बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी वितरणाचे योग्य नियोजन करण्यात यावे दहा गावासाठी एक कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांची नेमणूक करावी, ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे गट तयार करून त्यांच्या मागणी नुसार पुरवठा करावा. तसेच आगामी काळात शहरात दाखल होणारा बी बियाणे,खते याचा साठ्याच्या वितरण व वाहतूक बाबत तालुका कृषी अधिकारी यांनी पोलीस प्रशासन, व महसूल प्रशासन यांच्या सोबत समन्वय ठेवावा. आगामी काळातील खते ,बियाणे यांच्या पुरवठया बाबत महाबीज व खाजगी कंपन्या यांच्या सोबत संवाद साधून मागणी नुसार आवश्यक असलेले  बी बियाणे उपलब्ध करून घ्यावे.अशा सुचना यावेळी देण्यात आल्या कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात टाळण्यासाठी व शेतकऱ्यांना मदतीसाठी अशा  उपाययोजना करण्यात येणार आहेत अशी माहिती राज्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image