राज्य परिवहन विभागाकडून वाहतूक सुविधेच्या माहितीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

राज्य परिवहन विभागाकडून वाहतूक 
सुविधेच्या माहितीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना
लातूर:- कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने दि. 24 मार्च 2020 पासून लॉकडाऊन (टाळेबंदी) जारी केला आहे. परिणामी नौकरी, शिक्षण व अन्य कारणामुळे राज्याच्या विविध भागात नागरिक अडकुन राहिले आहेत. या नागरिकांना त्यांचे इच्छीत स्थळी जाण्यासाठी काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने प्रवास करु इच्छीणाऱ्या नागरिकांना रा प महामंडळाकडून मोफत वाहतूक सुविधेची माहिती होण्यासाठी रा प लातूर विभागात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यासाठी दुरध्वनी क्र. 02382-228991 यावर संपर्क साधण्यात यावा. 
 विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापक यांचे भ्रमणध्वनी व दुरध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.
 विभाग नियंत्रक स.भा. क्षिरसागर मो.नं.9422548204, दुरध्वनी क्र. 02382-228994, विभागीय वाहतूक अधिकारी (अतिरिक्त कार्यभार), सं.प. साळुंके मो.नं. 9822409932, दुरध्वनी क्र. 02382-228991, आगार प्रमुख लातूर ज.फ.कुरेशी मो.न.9421321565 दुरध्वनी क्र.02382-243626, आगार प्रमुख उदगीर य.मा.कानतोडे मो.नं.9881671293, दुरध्वनी क्र.02385-256156,आगार प्रमुख अहमदपूर स.ग. सोनवणे मो.नं.9028066005, दुरध्वनी क्र.02381-262278, आगार प्रमुख निलंगा यु.भा. थडकर मो.नं.9922850099, दुरध्वनी क्र.02384-242013, आगार प्रमुख औसा अ.द. गायकवाड मो.नं. 9860794194, दुरध्वनी क्र. 02383-222049 असे विभाग नियंत्रक रा प लातूर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image