राज्य परिवहन विभागाकडून वाहतूक सुविधेच्या माहितीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

राज्य परिवहन विभागाकडून वाहतूक 
सुविधेच्या माहितीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना
लातूर:- कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने दि. 24 मार्च 2020 पासून लॉकडाऊन (टाळेबंदी) जारी केला आहे. परिणामी नौकरी, शिक्षण व अन्य कारणामुळे राज्याच्या विविध भागात नागरिक अडकुन राहिले आहेत. या नागरिकांना त्यांचे इच्छीत स्थळी जाण्यासाठी काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने प्रवास करु इच्छीणाऱ्या नागरिकांना रा प महामंडळाकडून मोफत वाहतूक सुविधेची माहिती होण्यासाठी रा प लातूर विभागात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यासाठी दुरध्वनी क्र. 02382-228991 यावर संपर्क साधण्यात यावा. 
 विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापक यांचे भ्रमणध्वनी व दुरध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.
 विभाग नियंत्रक स.भा. क्षिरसागर मो.नं.9422548204, दुरध्वनी क्र. 02382-228994, विभागीय वाहतूक अधिकारी (अतिरिक्त कार्यभार), सं.प. साळुंके मो.नं. 9822409932, दुरध्वनी क्र. 02382-228991, आगार प्रमुख लातूर ज.फ.कुरेशी मो.न.9421321565 दुरध्वनी क्र.02382-243626, आगार प्रमुख उदगीर य.मा.कानतोडे मो.नं.9881671293, दुरध्वनी क्र.02385-256156,आगार प्रमुख अहमदपूर स.ग. सोनवणे मो.नं.9028066005, दुरध्वनी क्र.02381-262278, आगार प्रमुख निलंगा यु.भा. थडकर मो.नं.9922850099, दुरध्वनी क्र.02384-242013, आगार प्रमुख औसा अ.द. गायकवाड मो.नं. 9860794194, दुरध्वनी क्र. 02383-222049 असे विभाग नियंत्रक रा प लातूर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.


टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज