लातूर 128 व्यक्तींच्या स्वाबपैकी 104 निगेटिव्ह, 15 पॉझिटिव्ह तर 09 अनिर्णित*   *आज रुग्णालयातून 12 रुग्णांना डिस्चार्ज तर उदगीर येथील एका रुग्णाचा मृत्यू*

*लातूर 128 व्यक्तींच्या स्वाबपैकी 104 निगेटिव्ह, 15 पॉझिटिव्ह तर 09 अनिर्णित*


 


*आज रुग्णालयातून 12 रुग्णांना डिस्चार्ज तर उदगीर येथील एका रुग्णाचा मृत्यू*


 


लातूर :- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज दिनांक 25 जून 2020 रोजी एकूण 128 व्यक्तींचे स्वाब तपासणीसाठी आलेले होते. त्यापैकी 104 अहवाल निगेटिव्ह, 15 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह तर 9 व्यक्तींचे आवाहल अनिर्णित आले आहेत.


विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 68 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 55 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून , 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 03 व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या *04 व्यक्ती वाल्मिकी नगर लातूर येथील आहेत व माऊली नगर, विठ्ठल नगर, विवेकानंद चौक, आझाद चौक, एम. आय. डी. सी. लातूर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे व सारोळा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे*,


अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर व यांनी दिली.


तसेच उपजिल्हा रुग्णालय *उदगीर येथील 03 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्ती रावणगाव 1, नई आबादी 1 व चौबुरा जवळील 1 असे आहेत. तर अहमदपूर येथिल 02 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्ती धानोरा येथील आहेत*, अशी माहिती डॉ. संजय ढगे यांनी दिली आहे.


विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील काल पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या निवासी डॉक्टराच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तीच्या स्वबची तपासणी केली असता त्या सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर यांनी दिली आहे.


 


*आज 12 रुग्णांना रुग्णालयातुन सुट्टी* लातूरासाठी सलग दुसरा दिवस दिलासादायक ठरला आहे. आज लातूर जिल्ह्यातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 7, उपजिल्हा रुग्णालय निलंगा 1 व उपजिल्हा रुग्णालय उदगीर 4 अशा एकूण 12 रुग्णांना त्यांची प्रकृती बरी झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.


विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आज बाभळगाव 3, मोतीनगर 1, जुनी कापड लाईन 2 व भुसार लाइन 1 असे 7 रुग्ण तर उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथून 1 तसेच उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील किंनी 3 व नोबेल कॉलनी 1 असे 4 याप्रकारे लातूर जिल्ह्यातून 12 रुग्णांना त्यांची प्रकृती बरी झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, असे डॉ. ढगे यांनी सांगितले. तर आज उदगीर येथे एका 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झालेला असून त्या रुग्णास मधुमेह हायपर टेन्शन आजार होते.


जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 65, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 185 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 14 इतकी आहे, अशी माहिती डॉ संजय ढगे यांनी दिली आहे.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image