लातूर 131 पैकी 112 निगेटिव्ह, 09 पॉझिटिव्ह तर 10 अनिर्णित* *पॉझिटिव्ह व्यक्तीपैकी 1 गवळी गल्ली, 1 अजिंक्य सिटी तर 7 औसा शहर*

*लातूर 131 पैकी 112 निगेटिव्ह, 09 पॉझिटिव्ह तर 10 अनिर्णित*


*पॉझिटिव्ह व्यक्तीपैकी 1 गवळी गल्ली, 1 अजिंक्य सिटी तर 7 औसा शहर*


*औसा शहरात कालांन गल्लीत पूर्वीच्या संपर्कातील 04 व कारंजे गल्ली 03 असे एकूण 07 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले*


*जिल्ह्यात आज 05 रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी आली*


लातूर:- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज लातूर जिल्ह्यातील 131 स्वाब तपासणीसाठी आलेले होते. त्यापैकी 112 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह, 09 व्यक्तींच्या अहवाल पॉझिटिव्ह तर 10 व्यक्तींचा आवाहल अनिर्णित आहे. तर सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या 71 इतकी आहे.


विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 55 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 52 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 02 व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आले आहेत.


पॉझिटिव्ह अहवाल आलेली व्यक्ती गवळी नगर लातूर येथील आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्र बाभळगाव येथून 22 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 20 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल अनिर्णित आला आहे व एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेली 78 वर्ष वयाची व्यक्ती अजिंक्य सिटी येथील रहिवासी आहे, अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


औसा तालुक्यातील 22 व्यक्तींचे स्वाब तपासणीसाठी आलेले होते. त्यापैकी औसा शहरातील 07 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या 04 व्यक्ती या कालन गल्ली येथील पूर्वीच्या व्यक्तीच्या संपर्कातील आहेत तर 03 व्यक्ती या कारंजे गल्ली येथील आहेत. कारंजे गल्ली येथील पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील एक व्यक्ती कोरोना बाधित असून पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ढगे यांनी दिली आहे.


*आज 05 रुग्णांना डिस्चार्ज*


आज विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतून दोन रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तर उदगीर उपजिल्हा रुग्णालयातून तीन रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालय प्रशासनाने घरी जाण्यासाठी सुट्टी दिली, अशी माहिती डॉ. ढगे यांनी दिली.


सद्यस्थितीत कोरोना विलगीकरण कक्षामध्ये एकूण 27 रुग्ण भरती असून त्यापैकी अतिदक्षता विभागात एकूण 14 रुग्ण असून त्यामध्ये 04 रुग्ण व्हेंटिलेटरवर व 06 रुग्ण ऑक्सिजन वर आहेत व इतर 04 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तसेच कोरोना विलगीकरण कक्षातील इतर 13 रुग्णाची प्रकृती सद्यस्थितीत स्थिर आहे अशी महिती प्राध्यापक व विभागप्रमुख औषधवैद्यकशास्त्र विभाग डॉ. निलिमा देशपांडे, कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे, डॉ. गजानन हलकंचे डॉ. विनायक सिरसाठ विभागप्रमुख बधिरीकरणशास्त्र विभाग व डॉ. संतोषकुमार डोपे वैद्यकीय अधिक्षक यांनी दिली.


जिल्ह्यात आज रोजी उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या एकूण 71, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 151 तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 13 इतकी आहे.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image