भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी मधुमती कनशेट्टे

भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी मधुमती कनशेट्टे


उदगीर : उदगीर शहर भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी मधुमती कनशेट्टे यांची निवड करण्यात आली आहे.


मधुमती कनशेट्टे या गेल्या अनेक वर्षापासून भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून काम करीत आहेत. मागच्या काळात पक्षकार्यात त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेवून पक्षाचे 


माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष रमेश कराड, माजी आ. गोविंद केंद्रे, माजी जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भोसले, भगवानराव पाटील तळेगावकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड, तालुकाध्यक्ष बस्वराज रोडगे, प्रा. पंडित सूर्यवंशी, बालाजी गवारे, महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे, यांच्या सूचनेवरून शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर यांनी नियुक्ती केली आहे.


पक्षाचे विचार समाजातील तळागाळात पोहोचवावे, या अपेक्षेसह जास्तीत जास्त महिलांचे संघटन करून पक्षवाढीसाठी काम करावे असे आवाहन मधुमती कनशेट्टे यांना दिलेल्या पत्रातून केले आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.


मधुमती कणशेट्टे यांना नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी बापूराव राठोड, सुधीर भोसले, उत्तरा कलबुर्गे, नगरसेवक मनोज पुदाले, बापूराव यलमटे, ऍड. दत्ताजी पाटील, ऍड. सावन पस्तापुरे, गणेश गायकवाड, आनंद बुंदे, आनंद साबणे, शंन्नो शेख, उषा माने, जया काबरा यांची उपस्थिती होती.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image