विलासरावांच्या शेजारी गोपीनाथरावांचा पूर्णाकृती पुतळा.. लातूर जिल्हा परिषदेचा ठराव

विलासरावांच्या शेजारी गोपीनाथरावांचा पूर्णाकृती पुतळा..


लातूर जिल्हा परिषदेचा ठराव


लातूर: जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या काँग्रेसचे दिवंगत नेते स्व. विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतल्याशेजारी भाजपाचे दिवंगत नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचा ठराव लातूर जिल्हा परिषदेने घेतला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी दिली.


16 जून 2020 रोजी लातूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत लातूर जिल्हा परिषदेच्या आवारात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्या शेजारी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.


महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दो हंसो का जोडा‘ अशी ज्यांची ओळख आहे, ते दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे आता लातुरात पुतळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येणार आहेत. वेगवेगळ्या पक्षात, प्रसंगी एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे पक्के मित्र म्हणून हे दोघेही परिचित होते. अगदी विद्यार्थी दशेपासून ते महाविद्यालयीन जीवनात देशमुख-मुंडे जोडीचे खुमासदार किस्से राजकारणात अजूनही ऐकवले जातात. अशा या मित्रांना आता पुतळ्याच्या रुपातही एकत्र आणण्याचा निर्णय जिल्हा लातूर परिषदेने घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या आवारात देशमुख यांच्या शेजारीच मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असून तसा सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे.


महाराष्ट्राच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचे किस्से त्यांच्या पश्चात देखील चर्चिले जातात. हे दोघे एका व्यासपीठावर येणे म्हणजे त्यांच्या चाहत्यांना एक पर्वणीच असायची. अगदी ग्रामपंचायतीपासून या दोघांच्या राजकारणाला सुरूवात झाली असली तरी त्यांची मैत्री मात्र त्याही आधीची म्हणजे महाविद्यालयापासूनची होती. दोघे पुण्याला शिकायला असल्यामुळे त्या काळातील गंमतीजमती हे दोघे एकत्र आल्यानंतर आपल्या भाषणातून सांगायचे.


राजकारणात या दोघांनीही मोठी उंची गाठली होती. आमदार ते राज्याचे मुख्यमंत्री आणि दिल्लीत केंद्रीय मंत्री होत विलासराव देशमुख यांनी त्यांच्या भाषेत सांगायचे झाले तर दोन्ही कडची हवा अनुभवली. तर गोपीनाथ मुंडेचा प्रवासही असाच होता. युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले गोपीनाथ मुंडे पुढे मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात ग्रामविकास खात्याचे मंत्री झाले. दोघेही नेहमी विरोधी पक्षात राहीले, पण पक्ष त्यांच्या मैत्रीच्या आड कधी आलाच नाही. पण या दोघांची खऱ्याखुऱ्या आयुष्यातील एक्झीटसुध्दा मनाला चटका लावणारी ठरली होती.


आता दोघेही हयात नाहीत, पण त्यांच्या निधनानंतरही त्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न लातूर जिल्हा परिषदेने केला आहे. जिल्हा परिषदेतील विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याशेजारी मुंडे यांचा पुतळा उभारून या दोघांच्या मैत्रीचा धागा अधिक घट्ट करण्याचा हा प्रयत्न म्हणावा लागेल.


मंगळवारी सर्वसाधारण सभेत माजी समाजकल्याण सभापती संजय दोरवे यांनी हा ठराव मांडला.या ठरावाला काँग्रेस पक्षातर्फे नारायण आबा लोखंडे, राष्ट्रवादी पक्षातर्फे माधव जाधव, भाजप तर्फे जिल्हा परिषद उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, बांधकाम सभापती संगीता घुले, महिला व बालविकास सभापती ज्योती राठोड, कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, रामचंद्र तिरुके, डॉ.संतोष वाघमारे यांनी अनुमोदन दिले व हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.


पुतळ्यासाठी साठ लाख रूपये खर्च येणार असून राजकारणात कटुता वाढू नये या हेतूने तो उभारण्यात येणार असल्याचे सांगत जि. प. अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी राजकारणातील नव्या पिढीला या दोन मित्रांच्या पुतळ्यातून प्रेरणा मिळेल, असा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला. .


टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज