फादर्स डेच्या दिवशीच मुलांकडून जन्मदात्या पित्याचा खून

फादर्स डेच्या दिवशीच मुलांकडून जन्मदात्या पित्याचा खून


निलंगा : आज फादर्स डे दिवशीच निलंगा तालुक्यात मुलाने बापाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून हा खून झाल्याची चर्चा आहे.


निलंगा तालुक्यातील भोसलेवाडी या गावात पंचप्पा धुप्पाधुळे यांची वडिलोपार्जित शेत जमीन आहे. पावसाने चांगली साथ दिल्यामुळे त्यांनी पेरणी सुरू केली. या शेत जमिनीचा वाद आहे. त्याचा मुलगा नागनाथ यांचा वडिलांशी वाद होता. वडिलांनी पेरणी सुरू केली याचा राग त्याच्या मनात होता. या रागातून त्याचे वडिलांशी भांडण झालं. या वादात नागनाथ याची मुले बायको आणि मेव्हणे यांनीही साथ दिली. नागनाथ याने लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. यात पंचप्पा यांचा मृत्यू झाला आहे. हे भांडण सोडविण्यास गेलेल्या चार जणांना जबर मार बसला आहे. जखमींवर निलंगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बाबत निलंगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेतील सर्व आरोपी फरार झाले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


 


 


टिप्पण्या
Popular posts
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज
लातूर लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान ; 19 लाखापेक्षा अधिक मतदार संख्या • जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू • मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविणार : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे
इमेज
आंध्र प्रदेशातील विद्यार्थांना उदगीरच्या निवारा केंद्राचा आधार नगराध्यक्ष बागबंदे यांची तत्परता : घरी पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू उदगीर: उदगीरच्या रेल्वे पटरीवरुन काही विध्यार्थ्यांचा ग्रुप हैदराबादकडे पायी जात असल्याची माहिती मिळताच तत्परता दाखवीत उदगीरचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी या विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात असल्याचे नगराध्यक्ष बागबंदे यांनी सांगितले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम व शेजारच्या जिल्ह्यातील 16 विद्यार्थी उदगीर येथील ऍग्रीकल्चर ट्रेनिंग सेंटर येथे ट्रेनिंग घेत असत. शहरातील एस. टी. कॉलनी भागात एकत्र होस्टेलवर रहायला होते. सध्या देशभरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढला असून तो प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय झाली. देशात कोरोना विषाणूंमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चिंतेपोटी विद्यार्थ्यांना गावाकडे परत येण्याचा आग्रह धरला होता. एकीकडे पालकांचा आग्रह तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे परत जाण्यासाठी कसलीच सोय नसल्याने विद्यार्थी चिंतेत सापडले होते. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित विचार करून पायी गावाकडे जाण्याची तयारी केली. आपले सामान खांद्यावर घेऊन रेल्वे पटरी मार्गाने हे सर्व विद्यार्थी गावाकडे जायला निघाले. भाजपाच्या कार्यकर्त्यास हे लक्षात आल्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे रयांच्याशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनंती केली. नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी तात्काळ माणुसकीच्या भावनेतून तत्परता दाखवित रोटी कपडा बँकेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची उदगीर नगर परिषदेने बांधलेल्या निवारा केंद्रात राहण्याची व जेवणाची सोय केली. शिवाय या विद्यार्थ्यांची त्यांच्या गावी परत जाण्यासाठी सर्व ती मदत करणार असल्याचे सांगत त्यांच्या जाण्याची सोय होइपर्यंत या सर्व विद्यार्थ्यांची या निवारा केंद्रात सर्व सोय करण्याच्या सूचना संबंधितांना देऊन नगराध्यक्षांनी वैयक्तिक पाच हजार रुपये या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी दिले. यावेळी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना हात मास्क व सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सुधीर भोसले, नगरसेवक मनोज पुदाले, रामचंद्र मुक्कावार, अॅड. दत्ताजी पाटील, अॅड. सावन पस्तापुरे, रामेश्वर पवार, रोटी कपडा बँकेचे खुर्शीद आलम व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान नगरसेवक अॅड. दत्ताजी पाटील यांनी श्रीकोलमच्या प्रशासनासोबत या विद्यार्थ्यांचा संवाद साधून दिला.
इमेज
*राष्ट्रपतीच्या दौऱ्यासाठी उदगीर नगरी सज्ज*
इमेज
उदगीरच्या दूध डेअरीसंदर्भात लवकरच एन डी डी बी च्या अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक
इमेज