शासनाकडून हत्तीबेटावर पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार                                                 -पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे

शासनाकडून हत्तीबेटावर पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी


सर्वतोपरी मदत करणार


                                                -पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे


       लातूर/उदगीर :- लातूर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असलेले उदगीर तालुक्यातील हत्तीबेट हे"ब"वर्गीय पर्यटन स्थळ वन विभागाच्या ताब्यात आहे. तरि वन विभागाने हत्तीबेटावर वन विकासासह पर्यटन विकासाची कामे तात्काळ सुरू करावीत. या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली. उदगीर तालुक्यातील हत्तीबेट पर्यटन स्थळाच्या डोंगरावर आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.  


       यावेळी उस्मानाबाद विभागाचे विभागीय वन अधिकारी एम. आर.गायकर, सामाजिक वनीकरण अधिकारी प्रियंका गंगावणे, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी,तहसीलदार व्यंकटेश मुंडे ,गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल सांगोळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जिल्हा परिषद सदस्या उषा रोडगे, कल्याण पाटील, शिवाजी मुळे, ज्ञानेश्वर पाटील, वनरक्षक गोविंद घुले, नामदेव डिगोळे आदी उपस्थित होते. 


      राज्यमंत्री बनसोडे यांनी हत्तीबेट गडावरील श्री. सदगुरू गंगानाथ महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी हत्तीबेटाला ऐतिहासिक, धार्मिक व पौराणिक महत्त्व असल्याचे सांगून हत्तीबेट गडावरील संत गंगाराम बाबा संजीवन समाधीची पूजा करून दर्शन घेतले. 


यावेळी उपस्थित वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या हत्तीबेट गडावर वृक्षारोपणासह ज्या ज्या सुविधा करणे शक्य आहे, विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या सर्व घटकांचा आराखडा तयार करून तात्काळ सादर करण्याचे निर्देश श्री. बनसोडे यांनी दिले.


     कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून पाहुण्यांचा सत्कार व आभार प्रदर्शन व्ही. एस. कुलकर्णी यांनी केले.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image