लातूर 236 पैकी 192 निगेटिव्ह, 16 पॉझिटिव्ह, 11 अनिर्णित, 25 प्रलंबित व 02 रद्द*: उदगीरचे चार पॉझिटिव्ह

लातूर 236 पैकी 192 निगेटिव्ह, 16 पॉझिटिव्ह, 11 अनिर्णित, 25 प्रलंबित व 02 रद्द*


उदगीरचे चार पॉझिटिव्ह


लातूर, :- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज दिनांक 4 जुलै 2020 रोजी जिल्ह्यातील एकूण 236 व्यक्तींचे स्वाब तपासणीसाठी आलेले होते. त्यापैकी 192 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आलेला असून 16 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. तर 11 व्यक्तींचा आवाहल अनिर्णित, 25 व्यक्तींचा अहवाल प्रलंबित तर दोन व्यक्तींचा अहवाल रद्द करण्यात आलेला आहे, अशी माहिती आरोग्य प्रशासनाच्यावतीने देणार आलेली आहे.


पॉझिटिव आलेल्या 16 व्यक्ती पैकी 12 व्यक्ती महानगर पालिका हद्दीतील असून त्यातील 10 व्यक्ती एलआयसी कॉलनी, एक व्यक्ती खंडोबा गल्ली, एक व्यक्ती बालाजी नगर लातूर येथील आहे. चार व्यक्ती या उदगीर येथील असून त्यातील एक व्यक्ती नेत्रगाव, एक व्यक्ती मोमीनपुरा व दोन व्यक्ती ह्या देगलूर रोड येथील आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ढगे यांनी दिली आहे.


विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण 73 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 52 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे व एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे. उर्वरीत 17 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित असून 02 व्यक्तिचे स्वब परिपूर्ण न आल्यामुळे त्यांचा अहवाल रद्द करण्यात आला आहे.


दिनांक 03.07.2020 रोजी लातूर जिल्ह्यातील 08 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 04 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 04 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली*.


विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात एकूण 56 कोरोना (कोविड19) पॉझिटिव्ह रुग्ण दाखल आहेत व आज 05 रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. रामराव मुंढे यांनी दिली.


* जिल्‍हाधिकारी यांची विलगीकरण कक्षास भेट*


आज जिल्हाधिकारी श्री. जी. श्रीकांत यांनी विलासराव देशमुख वैदकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयातील कोरोना (कोविड19) पॉझिटिव्ह रुग्ण दाखल असलेल्या विलगीकरण कक्षास व अतिदक्षता विभागास भेट देऊन पी. पी. ई. कीट घालून पाहणी केली व आवश्यक त्या उपाय योजना सुचविल्या. यावेळी डॉ. गिरीष ठाकूर अधिष्ठाता, डॉ. रामराव मुंढे हे उपस्थित होते.


*लातूर*


जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 173, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 242 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 20 आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 428 इतकी आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ढगे यांनी दिली आहे.


*टीप:* 3 कर्नाटक राज्यात तर 4 रुग्ण उस्मानाबाद जिल्ह्यात वर्ग केलेले आहेत. परंतु उपचार लातूर येथे सुरू आहेत. त्या रुग्णांची नोंद संबंधित राज्य व जिल्ह्यामध्ये झालेली असल्याने आपल्या जिल्ह्याच्या एकूण रुग्णांच्या संख्येतून 7 रुग्ण कमी करण्यात आलेले आहेत.


आज13 रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यापैकी पाच रुग्ण हे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील तर 3 रुग्ण हे एमआयडीसी मधील कोविड केअर सेंटर येथील असून उर्वरित पाच रुग्ण हे उदगीर तालुक्यातील तोंडार पाटी येथे येथील कोविड केअर सेंटर मधील आहेत, असे एकूण 13 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला.


 


टिप्पण्या
Popular posts
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज
लातूर लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान ; 19 लाखापेक्षा अधिक मतदार संख्या • जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू • मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविणार : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे
इमेज
आंध्र प्रदेशातील विद्यार्थांना उदगीरच्या निवारा केंद्राचा आधार नगराध्यक्ष बागबंदे यांची तत्परता : घरी पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू उदगीर: उदगीरच्या रेल्वे पटरीवरुन काही विध्यार्थ्यांचा ग्रुप हैदराबादकडे पायी जात असल्याची माहिती मिळताच तत्परता दाखवीत उदगीरचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी या विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात असल्याचे नगराध्यक्ष बागबंदे यांनी सांगितले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम व शेजारच्या जिल्ह्यातील 16 विद्यार्थी उदगीर येथील ऍग्रीकल्चर ट्रेनिंग सेंटर येथे ट्रेनिंग घेत असत. शहरातील एस. टी. कॉलनी भागात एकत्र होस्टेलवर रहायला होते. सध्या देशभरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढला असून तो प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय झाली. देशात कोरोना विषाणूंमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चिंतेपोटी विद्यार्थ्यांना गावाकडे परत येण्याचा आग्रह धरला होता. एकीकडे पालकांचा आग्रह तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे परत जाण्यासाठी कसलीच सोय नसल्याने विद्यार्थी चिंतेत सापडले होते. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित विचार करून पायी गावाकडे जाण्याची तयारी केली. आपले सामान खांद्यावर घेऊन रेल्वे पटरी मार्गाने हे सर्व विद्यार्थी गावाकडे जायला निघाले. भाजपाच्या कार्यकर्त्यास हे लक्षात आल्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे रयांच्याशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनंती केली. नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी तात्काळ माणुसकीच्या भावनेतून तत्परता दाखवित रोटी कपडा बँकेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची उदगीर नगर परिषदेने बांधलेल्या निवारा केंद्रात राहण्याची व जेवणाची सोय केली. शिवाय या विद्यार्थ्यांची त्यांच्या गावी परत जाण्यासाठी सर्व ती मदत करणार असल्याचे सांगत त्यांच्या जाण्याची सोय होइपर्यंत या सर्व विद्यार्थ्यांची या निवारा केंद्रात सर्व सोय करण्याच्या सूचना संबंधितांना देऊन नगराध्यक्षांनी वैयक्तिक पाच हजार रुपये या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी दिले. यावेळी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना हात मास्क व सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सुधीर भोसले, नगरसेवक मनोज पुदाले, रामचंद्र मुक्कावार, अॅड. दत्ताजी पाटील, अॅड. सावन पस्तापुरे, रामेश्वर पवार, रोटी कपडा बँकेचे खुर्शीद आलम व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान नगरसेवक अॅड. दत्ताजी पाटील यांनी श्रीकोलमच्या प्रशासनासोबत या विद्यार्थ्यांचा संवाद साधून दिला.
इमेज
*राष्ट्रपतीच्या दौऱ्यासाठी उदगीर नगरी सज्ज*
इमेज
उदगीरच्या दूध डेअरीसंदर्भात लवकरच एन डी डी बी च्या अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक
इमेज