*डिजिटल शाळेच्या माध्यमातून प्रत्येक गावात जनजागृती करणार : आ. संभाजीराव पाटील निलंगेकर*

*डिजिटल शाळेच्या माध्यमातून प्रत्येक गावात जनजागृती करणार : आ. संभाजीराव पाटील निलंगेकर*


निलंगा : कोरोना विषाणू संसर्ग आता समुह संसर्गाकडे वळला असून याकरीता ग्रामीण भागातील लोकांमध्ये सतत जनजागृती करणे आवश्यक आहे. याचाच एक भाग म्हणून येणार्या पंधरवाड्यात प्रत्येक गावातील डिजीटल शाळेच्या माध्यमातून लोकांची, अधिकारी वर्ग, आरोग्य यंत्रणा व लोकप्रतिनिधीशी सुसंवाद साधून त्यांच्यामध्ये कोरोना विषाणू बाबत जनजागृती करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आढावा बैठकीत केले.


 येथील उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात आज शुक्रवारी माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी कोरोना विषाणू प्रतिबंधाबाबत अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. यावेळी भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, नगराध्यक्ष बाळासाहेब (श्रीकांत) शिंगाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख, निलंगा तहसीलदार गणेश जाधव, देवणी तहसीलदार सुरेश घोळवे, शिरुर अनंतपाळ तहसीलदार अतुल जटाळे, निलंगा गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, देवणीचे मनोत राऊत, शिरुर अनंतपाळचे नंदकिशोर शेरखाने, न.प.मुख्याधिकारी मल्लिकार्जून पाटील , आरोग्य अधिकारी डॉ,श्रीनिवास कदम आदी उपस्थित होते.


कोरोना विषाणूचा संसर्ग आता शहरी भागातून ग्रामीण भागात आला आहे. याकरीता आता ग्रामीण भागातील यंत्रणा सुसज्ज करणे गरजेचे आहे. त्याबरोबरच या भागातील जनतेमध्ये याकरीता जनजागृती करणे आवश्यक आहे. शहरी भागातील राहणीमान व ग्रामीण भागातील राहणीमानामध्ये भरपूर फरक असतो. त्यामूळे जनतेशी सुसंवाद साधुन त्यांच्यामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. या करीता विविध योजना अंमलात आणून काम गरजेचे आहे. त्या बरोबरच सर्वां ची सुरक्षितताही महत्वाची आहे.  


 


सध्या मतदारसंघात गाव स्वास्थ्य व सुरक्षा अभियाना अंतर्गत थर्मल मिटर व ऑक्सीमीटरव्दारे नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी सर्व पदाधिकारी, सरपंच,ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी,तलाठी, आशा ताई व बीएलओ यांच्या मार्फत करण्यात येत आहे. यात देवणी मधील 23497 , शिरुर अनंतपाळ 5929,व निलंग्यातील 1400 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणी दरम्यान शहरातील व मदनसुरी येथील प्रत्येकी एका रुग्णाची कोरोना तपासणी करणे गरजेचे आहे असे लक्षात आल्यानंतर ते दोन्ही रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आता आणखी सुक्ष्म पध्दतीची तपासणी करण्याच्या सुचना आ. निलंगेकर यांनी केल्या. 


 


कोरोना या आजारापासून भयभीत होण्यापेक्षा त्यापासून वाचण्यासाठी उपाययोजना करणे गरजेच्या आहेत. त्यासाठी प्रत्येक कुटुबांत एक कोरानायोध्दा तयार करणे गरजेचे आहे. याबरोबर कुटुबांती प्रत्येक सदस्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आजीच बटवा, योगासने व वनस्पती औषधाचा वापर करणेही गरजेचे असल्या बाबत जनजागृती व प्रसार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना विषाणू हा आता आपल्या भागातही समूह संसर्गात आला असून या करिता आरोग्य यंत्रणेने सांगितलेल्या सुचनांचे तंतोत पालन करणे गरजेचे आहे. त्याबरोबरच शासनाने या करीता ठरवून दिलेल्या नियमाचे पालनही काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. या करीता प्रथम नागरीकांमध्ये विविध उपाय योजनेतून प्रसिध्दी करुन त्यांच्या नंतर काही ठिकाणी कारवाईही करणे गरजेचे असल्याच्या सुचनाही आ. निलंगेकर यांनी अधिकार्‍यांना केल्या.


या बैठकी नंतर माजी पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा शहरातील कन्टेंनमेंट झोन ची पाहणी करुन अधिकार्‍यांना सुचना केल्या.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image