महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 94.70 टक्के 

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 94.70 टक्के


 उदगीर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी , मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा निकाल 94. 70 टक्के लागला असून विज्ञान शाखेत कोटलवार रिया गजानन हिने 610 गुण घेऊन प्रथम, काकनाळे समृद्धी विलास 576 गुण घेऊन द्वितीय, शेख फैजान जमीर 548 गुण घेऊन तिसरा आला आहे. विज्ञान शाखेचा निकाल 96. 66 टक्के लागला असून 11 विद्यार्थी विशेष प्राविण्य, 93 प्रथम श्रेणीत आहेत. कला शाखेत बिरादार संतोषी प्रशांत 584 गुण घेऊन प्रथम, बिरादार सिद्धेश्वर दिलीप 547 गुण घेऊन द्वितीय, गुंजरगे नलिनी सुभाष 536 गुण घेऊन तिसरी आली आहे. कला शाखेचा निकाल 90.47 टक्के लागला असून 9 विशेष प्रावीण्य, 21 प्रथम श्रेणीत आहेत. वाणिज्य शाखेत खत्री लीना सुभाष 614 गुण घेऊन प्रथम, बिरादार वैभवी सूर्यकांत 603 गुण घेऊन द्वितीय, कांबळे आकाश धोंडीबा 551 गुण घेऊन तृतीय आला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल 92.53 टक्के लागला असून 15 विशेष प्राविण्य , 55 प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. एच. एस. सी. होकेशनल शाखेचा निकाल 85 टक्के लागला असून धूमसुरे राहूल बालाजी 489 गुण घेऊन प्रथम, मगर गोपीचंद सोपानराव 487 गुण घेऊन द्वितीय, वाघमारे सोनाबाई ज्योतीराम 461 गुण घेऊन तृतीय आली आहे.


गुणवंतांचे संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहर पटवारी, सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. राजकुमार मस्के (व.म.), उपप्राचार्य प्रा.आर. एन. जाधव (क.म.) , पर्यवेक्षक प्रा. सी. एम. भद्रे, प्रा. जे.आर. कांदे , प्रा. टी. एन. सगर यांनी अभिनंदन केले आहे .


टिप्पण्या
Popular posts
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज
लातूर लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान ; 19 लाखापेक्षा अधिक मतदार संख्या • जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू • मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविणार : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे
इमेज
आंध्र प्रदेशातील विद्यार्थांना उदगीरच्या निवारा केंद्राचा आधार नगराध्यक्ष बागबंदे यांची तत्परता : घरी पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू उदगीर: उदगीरच्या रेल्वे पटरीवरुन काही विध्यार्थ्यांचा ग्रुप हैदराबादकडे पायी जात असल्याची माहिती मिळताच तत्परता दाखवीत उदगीरचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी या विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात असल्याचे नगराध्यक्ष बागबंदे यांनी सांगितले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम व शेजारच्या जिल्ह्यातील 16 विद्यार्थी उदगीर येथील ऍग्रीकल्चर ट्रेनिंग सेंटर येथे ट्रेनिंग घेत असत. शहरातील एस. टी. कॉलनी भागात एकत्र होस्टेलवर रहायला होते. सध्या देशभरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढला असून तो प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय झाली. देशात कोरोना विषाणूंमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चिंतेपोटी विद्यार्थ्यांना गावाकडे परत येण्याचा आग्रह धरला होता. एकीकडे पालकांचा आग्रह तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे परत जाण्यासाठी कसलीच सोय नसल्याने विद्यार्थी चिंतेत सापडले होते. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित विचार करून पायी गावाकडे जाण्याची तयारी केली. आपले सामान खांद्यावर घेऊन रेल्वे पटरी मार्गाने हे सर्व विद्यार्थी गावाकडे जायला निघाले. भाजपाच्या कार्यकर्त्यास हे लक्षात आल्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे रयांच्याशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनंती केली. नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी तात्काळ माणुसकीच्या भावनेतून तत्परता दाखवित रोटी कपडा बँकेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची उदगीर नगर परिषदेने बांधलेल्या निवारा केंद्रात राहण्याची व जेवणाची सोय केली. शिवाय या विद्यार्थ्यांची त्यांच्या गावी परत जाण्यासाठी सर्व ती मदत करणार असल्याचे सांगत त्यांच्या जाण्याची सोय होइपर्यंत या सर्व विद्यार्थ्यांची या निवारा केंद्रात सर्व सोय करण्याच्या सूचना संबंधितांना देऊन नगराध्यक्षांनी वैयक्तिक पाच हजार रुपये या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी दिले. यावेळी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना हात मास्क व सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सुधीर भोसले, नगरसेवक मनोज पुदाले, रामचंद्र मुक्कावार, अॅड. दत्ताजी पाटील, अॅड. सावन पस्तापुरे, रामेश्वर पवार, रोटी कपडा बँकेचे खुर्शीद आलम व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान नगरसेवक अॅड. दत्ताजी पाटील यांनी श्रीकोलमच्या प्रशासनासोबत या विद्यार्थ्यांचा संवाद साधून दिला.
इमेज
*राष्ट्रपतीच्या दौऱ्यासाठी उदगीर नगरी सज्ज*
इमेज
उदगीरच्या दूध डेअरीसंदर्भात लवकरच एन डी डी बी च्या अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक
इमेज