रसिकांना भावला आभासी विश्वातील श्याम! आंतरभारतीच्या उपक्रमास प्रतिसाद

रसिकांना भावला आभासी विश्वातील श्याम! आंतरभारतीच्या उपक्रमास प्रतिसाद


उदगीर: एकविसाव्या शतकातल्या आभासी विश्वातही श्यामची आजही प्रभावी असल्याचे दिसून आले. आंतरभारतीच्या माध्यमातून धनंजय गुडसूरकर यांनी सादर केलेल्या एकपात्री प्रयोगास रसिकांचा प्रतिसाद मिळाला.


टाळेबंदीच्या काळात आंतरभारती या साने गुरुजींच्या स्वप्नातील संस्थेने  ६४ कलांच्या सादरीकरणाचा उपक्रम आयोजित केला आहे.या उपक्रमांतर्गत धनंजय गुडसूरकर यांनी "हॕलो,मी श्याम बोलतोय या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण आंतरभारतीच्या फेसबुक पेजवरून केले.


श्यामचे बालपण,त्याच्या कुटुंबाची


बदलती परिस्थिती ,त्यातून निर्माण होणारे प्रश्न ,विपरीत परिस्थितीतही श्यामची आई ची मुल्यावरील निष्ठा , वर्तनातून मुलांवर  केलेले संस्कार याचे सुंदर विवेचन या एकपात्री प्रयोगातून गुडसूरकर यांनी केले.


  या एकपात्री प्रयोगातून गुडसूरकर यांनी वेगवेगळ्या दहा भूमिका साकारल्या."एका डोळ्यात हासू अन दुसऱ्या डोळ्यात आसू " आणणाऱ्या या प्रयोगाने रसिकांना मंत्रमुग्ध तर केलेच पण संस्काराची पेरणीही केली.दीड हजार   रसिकांनी याचा लाभ घेतला."गुडसूरकर यांनी सादर केलेला प्रयोग अत्यंत प्रभावी असून शाळाशाळांमधून  त्याचे सादरीकरण होणे गरजेचे आहे"अशा शब्दांत आंतरभारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य सदाविजय आर्य यांनी या कलाविष्काराचे कौतुक केले. हा नाट्याविष्कार कौतुकास्पद असल्याचे आंतरभारतीचे राष्ट्रीय सचिव अमर हबीब म्हणाले.६४ कला सादरीकरणाच्या माध्यमातून कलांचा परिचय व दृढीकरण होत असल्याचे कार्यक्रम कार्याध्यक्ष डी.एस.कोरे यांनी सांगितले.


 


 


 


 


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image