लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आज शहरात तोबा गर्दी

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आज शहरात तोबा गर्दी


उदगीर: उद्या दि. १५ जुलै पासून ३१ डिसेंबर पर्यंत लॉकडाऊन चालू होणार असल्याने शहर व तालुक्यातील नागरिकांनी आज शहरात खरेदीसाठी तोबा गर्दी केली होती. यावेळी कोणाला ना सोशल डिस्टन्स चे भान नव्हते ना कोणाला आपल्या जीवाची पर्वा नव्हती.


देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉक डाऊन लागू करून नागरिकांना घराबाहेर येण्यास बंदी घातली होती. त्याचा परिणाम कोरोनावर आळा घालण्यास मदत झाली. तद्नंतरच्या काळात लॉकडाऊन दोन व तीन नंतर सरकारच्या वतीने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत हळूहळू व्यवहारांना मुभा दिली. हे सर्व व्यवहार करीत असताना सोशल डिस्टन्स चे नियम पाळण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. मात्र कुठेही हे आदेश पाळले गेले नसल्याचे निदर्शनास येत होते. शिवाय जिल्हाबाहेरून येणाऱ्यांची संख्याही मोठया प्रमाणात वाढली आहे. याचा परिणाम कोरोनाचे रुग्णात वेगाने वाढ झाली. आज लातूर जिल्ह्यात सहाशेच्या वर कोरोना बाधित रुग्ण वाढले असून मयताच्या संख्येतही वाढ होत आहे.


वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी उद्या दि. १५ जुलै ते ३१ जुलै पर्यंत कडक लॉक डाऊन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.


उद्यापासून पंधरा दिवस कडक लॉक डाऊन होणार असल्याने शहर व तालुक्यातील नागरिकांनी बाजारात एकच गर्दी केली होती. किराणा, कपडा, चप्पल, बूट, आदींसह सर्वच व्यापाऱ्याच्या दुकानांतून नागरिकांनी गर्दी करून सोशल डिस्टन्सचे सर्व नियम पायदळी तुडविले आहेत. त्यामुळे आजच्या गर्दीतून आणखी कोरोना रुग्ण वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image