लाॕकडाऊनमुळे पुरोहीताची आर्थिक घडी विस्कटली

लाॕकडाऊनमुळे पुरोहीताची आर्थिक घडी विस्कटली


उदगीरः लाॕकडाउन मुळे शेती व्यापारी वर्ग, उद्योगधंदे यांचावर आर्थिक संकट ओढवले आहे.पोरोहित्य करणाऱ्या पुरोहित वर्गापुढे ही पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लाॕकडाउन काळात पूजाअर्चा शांति पाठाची कामे बंद होती .निर्बंध काही शिथिल झाले असले तरी गृहनिर्माण संस्था आणि हौसिंग सोसायट्यानी काॕलनी [गल्ली] स्वतंत्र बंधने तयार केल्याने पौरोहित्य करणाऱ्यांवर कामे असूनही परवानगी मिळत नाही .त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची झाली असून,त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गर्दी टाळण्यासाठी नित्योपचार पूजा वगळता देव देवतांची मंदिरे आणि इतर धार्मिक विधी बंद करण्यात आले. मंदिरातील भक्तांसाठी होणारी पूजाअर्चा आणि घरोघरी चालणारे धार्मिक विधी यामध्ये खंड पडला आहे. त्यामुळेच पोरोहित्य करणाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. कोरोणाच्या उद्रेकामुळे आणि त्याला अटकाव करण्यासाठी मागील तीन महिन्यापासून जाहीर करण्यात आलेल्या लाॕकडाउन मुळे पौरोहित्य करणाऱ्या अनेक गुरुजींच्या [पूजारी] कुटुंबावर उपासमारी ची वेळ आली आहे .सर्व आर्थिक व्यवहार विस्कळीत झाले असून मुलांचे शिक्षण, आजारपण आणि कौटुंबिक खर्चासाठी कर्ज काढण्याची वेळ त्यांचावर आली आहे .एप्रिल मे आणि जून महिन्यात साखरपुडा आणि लग्नाचे जवळपास ३३ मुहूर्त होते. परंतु कोरोनाचे विघ्न आल्याने या सर्व तारखा रद्द झाल्या. वास्तूशांती,शांती, मूंज व्रतबंध, ग्रहयद्न, सत्यनारायण,अभिषेक यांच्या तिथी नुसार काही दिवस अगोदर तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. हे सर्व कार्यक्रम रद्द झाल्याने तीन महिने घरात बसून रहावे लागले आहे. बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आल्याने श्राद्धकर्माचे सोपस्कार देखील बुडाले. एकंदरीत सुरू असणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांची घडी पूर्णतः विस्कटलेली आहे. लाॕकडाउनमुळे आयटी, औद्योगिक,व्यावसायिक,व्यापारी वर्गापासुन ते सामान्य वर्गापर्यंत सर्वांना आर्थिक झळ बसली आहे .त्याच प्रमाणे पौरोहित्य करणाऱ्या वर्गावर विपरीत परिणाम झाला आहे. कसेबसे छोट्या-मोठ्या धार्मिक कार्यक्रमांच्या तारखा घेऊन काम करण्यास सुरवात झाली आहे.परंतु अनेक काॕलनी [गल्ली] बंधने घातल्याने प्रवेश दिला जात नाही .


नेहमीच्या यजमानांना आर्थिक चणचण भासत आसल्याने त्यांनी देखील धार्मिक कार्यक्रम करण्यास हात आखडता घेतला आहे. तर काही यजमानांच्या मनात अद्यापही कोरोनाची भीती आसल्याने परंपरेनुसार वार्षिक कार्यक्रमांना तिलांजली दिली आहे.


----------------------


श्रावण महिना अवघ्या पंधरा दिवसांवर असताना अद्याप पूजाअर्चांबाबत यजमांनाकडून बोलावणे नाही किंवा मोठे कार्यक्रम नसल्याने पुढेही उपजीविकेचा प्रश्न कायम राहणार आसल्याची चिंता पुरोहित वर्गातून व्यक्त केली जात आहे, त्यामुळे अडचणीत भर पडत आहे.शासनाने तात्काळ लक्ष देऊन योग्य तो मार्ग काढावा.[पुरोहित].वे.शा.सं.वासुदेव महाराज (द्वैपायन)


-----------------------


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image